‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरण : राहुल, सोनियांना दिल्ली हायकोर्टाची नोटीस Photo : X (@LiveLawIndia)
राष्ट्रीय

‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरण : राहुल, सोनियांना दिल्ली हायकोर्टाची नोटीस

दिल्ली उच्च न्यायालयाने ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. ईडीने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते, परंतु राऊज ॲव्हेन्यू न्यायालयाने दखल घेण्यास नकार दिला होता.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. ईडीने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते, परंतु राऊज ॲव्हेन्यू न्यायालयाने दखल घेण्यास नकार दिला होता.

सुनावणीदरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयात ईडीचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, अंतिम निष्कर्ष असा आहे की आरोपींना ५० लाख रुपयांच्या बदल्यात दोन हजार कोटी रुपयांची मालमत्ता मिळाली. या प्रकरणातील पुढील सुनावणी १२ मार्च रोजी होणार आहे.

ईडीने राऊज ॲव्हेन्यू न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि आता दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींना नोटीस बजावली आहे. ईडीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने सोनिया गांधी आणि राहुल गांधींसह सात आरोपींना नोटीस बजावल्या आहेत.

तुषार मेहता यांनी सांगितले की, जून २०१४ मध्ये एका व्यक्तीने खासगी तक्रार दाखल केली होती, ज्याची कनिष्ठ न्यायालयाने दखल घेतली आणि त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने त्यास स्थगिती दिली. तुषार मेहता यांनी सांगितले की, ईडीने तपास पूर्ण केला, पुरावे गोळा केले आणि आरोपींचे जबाब नोंदवले आहेत.

यंदाचा एल निनो तीव्र रूप धारण करणार; तो भयंकर आणि खर्चिक ठरण्याची शास्त्रज्ञांना भीती

भारताचा दिग्गज नेमबाज हरपला! मनू भाकरचे प्रशिक्षक जसपाल राणा यांचे निधन, ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

संगीत नाटक अकादमीचे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर; अशोक पत्की, आनंद भाटे, अरुण नलावडे यांच्यासह महाराष्ट्रातील दिग्गज व युवा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव

मृतदेहाच्या गुप्तांगावरील विनोद भोवला! KEM ची डॉक्टर तरुणी अडचणीत; ३७० बिर्याणी वादानंतर प्रणित मोरेच्या शोतील आणखी एक क्लिप व्हायरल

Thane : १५ जूनपासून महापालिका शाळांचे शैक्षणिक वर्ष प्रारंभ; प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे होणार उत्साहात स्वागत