ANI
राष्ट्रीय

नितीश कुमारांचा भाजपला धक्का ; युती तोडत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला

नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन होणार असल्याचे वृत्त आहे. या सरकारला काँग्रेसने आधीच पाठिंबा जाहीर केला आहे.

वृत्तसंस्था

बिहारच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला असून मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नितीश कुमार यांच्या जेडीयूने एनडीएसोबतची युती तोडल्याची घोषणा केली आहे. नितीश कुमार यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा दिला. नितीशकुमार यांनी भाजपला धक्का दिल्यानंतर आता बिहारमधील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. नितीश कुमार यांच्या घरी आज खासदार आणि आमदारांची बैठक झाली. या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे.

बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूची युती तुटल्यानंतर आता बिहारमध्ये जेडीयू आणि लालूप्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल नवीन सरकार स्थापन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन होणार असल्याचे वृत्त आहे. या सरकारला काँग्रेसने आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. या नव्या सरकारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री असतील अशीही माहिती आहे. भाजप-जेडीयू सरकारला फक्त दोन वर्षे झाली असताना हे सरकार पडले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नितीशकुमार आणि भाजपमध्ये वाद सुरू होता. आता हा वाद शिगेला पोहोचला असून नितीशकुमार यांनी राजीनामा दिला आहे. नितीशकुमार यांनी यापूर्वीही भाजपशी युती तोडली होती. आता त्याची पुनरावृत्ती झाली आहे. गेल्या निवडणुकीत नितीशकुमार यांच्या जेडीयूला कमी जागा असतानाही मुख्यमंत्रीपद मिळाले होते .

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक