राष्ट्रीय

अबू सालेम केस : दिलासा नाहीच, सुप्रीम कोर्टाने दिला हा आदेश

मात्र, अबू सालेमची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याची सुटका करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे

वृत्तसंस्था

कुख्यात गुंड अबू सालेमच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने अखेर निकाल दिला आहे. सालेमने जन्मठेपेच्या शिक्षेला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अबू सालेमला दिलासा दिला नाही. मात्र, अबू सालेमची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याची सुटका करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात 25 वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकार पोर्तुगालला दिलेल्या शब्दाचा सन्मान करण्यास वचनबद्ध असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले. 2002 मध्ये भारताने पोर्तुगालला त्याच्या प्रत्यार्पणाचे आश्वासन दिल्याने त्याची शिक्षा 25 वर्षांपेक्षा जास्त असू शकत नाही, असे सालेमने म्हटले होते.

25 फेब्रुवारी 2015 रोजी विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेमला 1995 मध्ये मुंबईतील बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन आणि त्याचा चालक मेहंदी हसन यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार सालेमला 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. 11 नोव्हेंबर 2005 रोजी पोर्तुगालने त्याला भारताच्या ताब्यात दिले.

अमेरिकेच्या रोड आयलंडमधील ब्राउन विद्यापीठात गोळीबार; २ जणांचा मृत्यू, संशयिताचा शोध सुरू

BMC Election : मुंबई मनपा निवडणुकीची उद्या घोषणा?

सिडकोच्या घरांच्या किमतीत १० टक्के कपात; नवी मुंबईतील १७ हजार घरांची लॉटरी लवकरच

Mumbai : गोरेगावच्या महाविद्यालयात ड्रेस कोडवरून वाद; विद्यार्थिनींच्या उपोषणानंतर बुरखा बंदी मागे

Kerala Election Results : 'जिंकले तर विश्वास अन् हरले तर ईव्हीएमवर आरोप...'; राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपचा जोरदार हल्लाबोल