राष्ट्रीय

४ लाख हेक्टर जमिनीवर सेंद्रीय शेती

कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची माहिती

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : देशातील ८ राज्यांत ४.०९ लाख हेक्टरवर सेंद्रीय शेती केली जात आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली.

लोकसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, आंध्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ, ओदिशा, हिमाचल प्रदेश, झारखंड व तामिळनाडूत सेंद्रीय पद्धतीने शेती केली जात आहे. २०१९-२० पासून केंद्र सरकारने सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना सुरू केली आहे.

आंध्रातील १ लाख हेक्टर, मध्य प्रदेशात ८५ हजार हेक्टर, छत्तीसगडमध्ये ८५ हजार हेक्टर, केरळात ८४ हजार हेक्टर, ओदिशात २४ हजार हेक्टर, हिमाचल प्रदेशात १२ हजार हेक्टर, झारखंडमध्ये ३४०० व तामिळनाडूत २ हजार हेक्टर जमिनीवर सेंद्रीय शेती केली जाते.

नैसर्गिक शेती ही रसायनमुक्त असते. यात स्थानिक संसाधनाचा वापर केला जातो. यात गाईचे शेण, गोमूत्र आदींचा वापर केंद्रीय शेतीत केला जातो.

माल पोहोचल्याची आता डिजिटल नोंद; ई-वे बिल पोर्टलवर सुविधा सुरू

पारलेने 'मेलोडी'चे उत्पादन वाढविले...पंतप्रधान मोदींनी मेलोनी यांना दिलेल्या 'चाॅकलेट भेटी'नंतर मागणीत वाढ

...तर पॅरोल नाकारणे घटनाबाह्य! मुंबई उच्च न्यायालयाचा कैद्यांच्या हक्कासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यसभेच्या जागेसाठी १८ जूनला पोटनिवडणूक; सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर निवडणूक आयोगाची घोषणा

Pune : नसरापूर अत्याचारप्रकरणी २८ मे रोजी दोषारोप ठेवणार