राष्ट्रीय

४ लाख हेक्टर जमिनीवर सेंद्रीय शेती

कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची माहिती

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : देशातील ८ राज्यांत ४.०९ लाख हेक्टरवर सेंद्रीय शेती केली जात आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली.

लोकसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, आंध्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ, ओदिशा, हिमाचल प्रदेश, झारखंड व तामिळनाडूत सेंद्रीय पद्धतीने शेती केली जात आहे. २०१९-२० पासून केंद्र सरकारने सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना सुरू केली आहे.

आंध्रातील १ लाख हेक्टर, मध्य प्रदेशात ८५ हजार हेक्टर, छत्तीसगडमध्ये ८५ हजार हेक्टर, केरळात ८४ हजार हेक्टर, ओदिशात २४ हजार हेक्टर, हिमाचल प्रदेशात १२ हजार हेक्टर, झारखंडमध्ये ३४०० व तामिळनाडूत २ हजार हेक्टर जमिनीवर सेंद्रीय शेती केली जाते.

नैसर्गिक शेती ही रसायनमुक्त असते. यात स्थानिक संसाधनाचा वापर केला जातो. यात गाईचे शेण, गोमूत्र आदींचा वापर केंद्रीय शेतीत केला जातो.

थोडा आगे हो! लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने वाद; चार-पाच जणांनी केली मारहाण, कल्याणच्या मराठी विद्यार्थ्याने संपवलं जीवन

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; राज्यपाल-राष्ट्रपतींना वेळमर्यादा नाही, 'तो' निर्णय ठरवला असंवैधानिक

'बाबा मला मारलं म्हणून कुणीतरी दिल्लीला...'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला

नवरा, मुलगा किंवा मुलगी नसलेल्या महिलांनी खटले टाळण्यासाठी इच्छापत्र करावे ; सर्वोच्च न्यायालयाचे आवाहन

"गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन"; पुण्यातील कोयतागँगचा व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल