संग्रहित छायाचित्र  ANI
राष्ट्रीय

पाकिस्तान वाईट शेजारी - एस. जयशंकर ; दहशतवादाविरोधात कारवाईचा भारताला पूर्ण अधिकार!

भारताला वाईट शेजारी लाभला असून तो सतत दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम करतो, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे वाभाडे काढले आहेत.

Swapnil S

चेन्नई : भारताला वाईट शेजारी लाभला असून तो सतत दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम करतो, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे वाभाडे काढले आहेत. तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी काय करायला हवे याचा निर्णय भारत स्वत: घेईल, इतरांकडून त्याबाबत सल्ला घेण्याची भारताला गरज नाही, असे एस. जयशंकर म्हणाले.

आयआयटी मद्रासमधील एका कार्यक्रमात शुक्रवारी एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला आहे. सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानला सोडावे अशी विनंती तुम्ही करू शकत नाही, तसेच आमच्या देशात दहशतवादही पसरवू शकत नाही, असे जयशंकर यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे.

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर एस. जयशंकर म्हणाले, दहशतवादाविरोधात कारवाई करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. आपल्या सुरक्षेसाठी जे काही करावे लागेल, ते आपण करू. दहशतवादापासून आपल्या नागरिकांचे रक्षण करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे.

पॅराग्लायडिंग वर्ल्ड कपचा थरार सुरू; पाचगणीच्या आकाशात देशी-विदेशी पॅराग्लायडर्सची भरारी

Navi Mumbai : उद्या १२ तास पाणीपुरवठा बंद; खारघर आणि तळोजा परिसराला फटका, सिडकोची घोषणा

मीरा-भाईंंदरमध्ये मालमत्ता करात मोठी वाढ; महासभेत ठराव मंजूर; १ एप्रिल २०२६ पासून अंमलबजावणी

Bhiwandi : महापौर निवडणुकीला वेगळे वळण; भाजपने उमेदवार बदलला; नारायण चौधरी सेक्युलर आघाडीकडे

अजित पवार विमान अपघात : ब्लॅकबॉक्समधून डेटा मिळविण्यासाठी भारत घेणार अमेरिकेची मदत