संग्रहित छायाचित्र  ANI
राष्ट्रीय

पाकिस्तान वाईट शेजारी - एस. जयशंकर ; दहशतवादाविरोधात कारवाईचा भारताला पूर्ण अधिकार!

भारताला वाईट शेजारी लाभला असून तो सतत दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम करतो, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे वाभाडे काढले आहेत.

Swapnil S

चेन्नई : भारताला वाईट शेजारी लाभला असून तो सतत दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम करतो, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे वाभाडे काढले आहेत. तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी काय करायला हवे याचा निर्णय भारत स्वत: घेईल, इतरांकडून त्याबाबत सल्ला घेण्याची भारताला गरज नाही, असे एस. जयशंकर म्हणाले.

आयआयटी मद्रासमधील एका कार्यक्रमात शुक्रवारी एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला आहे. सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानला सोडावे अशी विनंती तुम्ही करू शकत नाही, तसेच आमच्या देशात दहशतवादही पसरवू शकत नाही, असे जयशंकर यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे.

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर एस. जयशंकर म्हणाले, दहशतवादाविरोधात कारवाई करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. आपल्या सुरक्षेसाठी जे काही करावे लागेल, ते आपण करू. दहशतवादापासून आपल्या नागरिकांचे रक्षण करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे.

अजित पवारांचा भाजपवर हल्लाबोल; "ज्यांनी-ज्यांनी माझ्यावर आरोप केले, त्यांच्यासोबतच...

MMRC चा मोठा निर्णय; सोमवारपासून Aqua Line मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, प्रवाशांना दिलासा

'बाई.. हा काय प्रकार?' कच्च्या आल्यावर सॉस अन् चहात केळी; लोकलमधील व्लॉगरच्या अजब खाद्यप्रयोगाने प्रवासी अवाक | Video

MMS वादानंतर पायल गेमिंगचा अध्यात्मिक नववर्षारंभ; सिद्धिविनायक दर्शनाने केली २०२६ ची सुरुवात

वयाच्या पन्नाशीतही इतकी एनर्जेटिक? मलायका अरोराचा 'हा' मॉर्निंग हेल्थ शॉट आहे यामागचं गुपित!