राजनाथ सिंह संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

‘पाकव्याप्त काश्मीर’ हा भारताचा अविभाज्य भाग - राजनाथ सिंह; पाकिस्तानसाठी ही परकीय भूमी!

पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा भारताचाच अविभाज्य भाग आहे. ‘पीओके’शिवाय जम्मू-काश्मीर अपूर्ण आहे.

Swapnil S

जम्मू : पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा भारताचाच अविभाज्य भाग आहे. ‘पीओके’शिवाय जम्मू-काश्मीर अपूर्ण आहे. पीओके ही पाकिस्तानसाठी परकीय भूमी आहे आणि ते दहशतवाद पसरवण्यासाठी या भूमीचा वापर करत आहेत. ‘पीओके’मध्ये दहशतवाद्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे चालवली जात आहेत, अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले.

जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथे मंगळवारी झालेल्या नवव्या सशस्त्र सेना वेटरन्स डे कार्यक्रमात राजनाथ सिंह म्हणाले की, “१९६५मध्ये अखनूर भागात भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले होते. पाकिस्तानी लष्कराचे सर्व प्रयत्न भारताने हाणून पाडले होते. आत्तापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सर्व युद्धांमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. १९६५ पासून पाकिस्तानने भारतात अवैध घुसखोरी आणि दहशतवादाला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली होती. आजही भारतात घुसणारे ८० टक्क्यांपेक्षा जास्त दहशतवादी पाकिस्तानातून येतात.”

Mumbai : पालिका शाळाही ‘गॅस’वर; मध्यान्ह भोजनात आता विद्यार्थ्यांना फळ वाटप, रुग्णालयांत सिलिंडर पुरवठा करण्यासाठी गॅस कंपनीला पत्र

अजित पवारांच्या अपघातातील सत्य सांगा! राष्ट्रवादीच्या सुनील शेळके यांची मागणी

Mumbai : विद्यार्थ्यांच्या नावाखाली कोणाचे भले? शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांचा सवाल; सहलीचा प्रस्ताव राखून ठेवला

उच्च शिक्षण विभागाच्या CET परीक्षांच्या तारखा निश्चित; लवकरच लॉगिनमध्ये हॉल तिकीट उपलब्ध होणार

स्थापत्य समिती शहर शिंदे सेनेकडे; अध्यक्षपदी यामिनी जाधव यांची बिनविरोध निवड