(संग्रहित छायाचित्र) 
राष्ट्रीय

पाकिस्तान एकतर भारतात दिसेल, नाहीतर इतिहासातून नष्ट होईल - योगी आदित्यनाथ

पाकिस्तानचे एकतर भारतात विलीनीकरण होईल किंवा पाकिस्तान इतिहासातून कायमचा नष्ट होईल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली: पाकिस्तानचे एकतर भारतात विलीनीकरण होईल किंवा पाकिस्तान इतिहासातून कायमचा नष्ट होईल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

आदित्यनाथ यांनी फाळणीविरोधी स्मृती दिनाच्या निमित्ताने आयोजित लखनौमधील एका कार्यक्रमात पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, जेव्हा आध्यात्मिक जगतात एखाद्याचे वास्तविक स्वरुप नसते, तेव्हा त्यास नष्ट व्हावेच लागेल. मात्र, त्यासाठी आपल्यालाही तयार असावेच लागेल. आपल्याला त्या चुकांवर विचार करावा लागेल, ज्यामुळे विदेशातील दृष्ट शक्तींना भारतात घुसणे आणि आपल्या देशातील पवित्र स्थळांवर हल्ला करण्याची संधी मिळते. भारताची अखंडता आणि संस्कृती अबाधित ठेवण्यासाठी आपणास ते करावेच लागेल. बांगलादेशमध्ये आज दीड कोटींपेक्षा जास्त हिंदू जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र, जगाचे तोंड बंद आहे. देशातील धर्मनिरपेक्षवाद्यांची तोंडे बंद आहेत, कारण आम्ही कमजोर आहोत. आपली व्होट बँक आपल्यापासून दूर जाईल, या हेतुने हे सर्व जण गप्प आहेत, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.

राज्यात अडीच लाख कोटींचे प्रकल्प; एक लाखांहून अधिक प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगारांची होणार निर्मिती - मुख्यमंत्री

होर्मुझमधून भारताकडे येणारे जहाज रोखले; इराणसोबतचा शस्त्रसंधीचा करार अनिश्चित काळासाठी वाढवण्याची ट्रम्प यांची घोषणा

रोहित पवार यांना दिलासा; शिखर बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणातून विशेष न्यायालयाने केले दोषमुक्त

मंत्रालयात गर्दी का, अन् कशासाठी?

आजचे राशिभविष्य, २३ एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत