राष्ट्रीय

पेटीएम पेमेंट बँकेच्या अध्यक्षांचा राजीनामा

१५ मार्चपासून पेटीएम पेमेंट बँकेला नवीन ठेवी व कर्ज देण्यास आरबीआयने बंदी घातली आहे. कारण बँकेने आवश्यक त्या नियमांची अंमलबजावणी केली

Swapnil S

नवी दिल्ली : पेटीएम पेमेंट बँकेचे अर्धवेळ अकार्यकारी अध्यक्ष विजय शेखर शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच बँकेच्या संचालक मंडळाची पुनर्रचना केली आहे.

१५ मार्चपासून पेटीएम पेमेंट बँकेला नवीन ठेवी व कर्ज देण्यास आरबीआयने बंदी घातली आहे. कारण बँकेने आवश्यक त्या नियमांची अंमलबजावणी केली नाही. पेटीएम पेमेंट बँकेने संचालक मंडळात फेरबदल केले आहेत. सेंट्रल बँकेचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन श्रीधर, माजी आयएएस अधिकारी देबेंद्रनाथ सारंगी, बँक ऑफ बडोदाचे माजी कार्यकारी संचालक अशोक कुमार गर्ग, माजी आयएएस अधिकारी रजनी सेखरी सिबल आदींची नियुक्ती संचालक मंडळावर केली.

पेटीएम ब्रँडची मालकी वन ९७ कम्युनिकेशन लिमिटेडची आहे. विजय शेखर शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे कंपनीने शेअर बाजाराला कळवले आहे. कंपनीचा संपूर्ण कारभार आता नवीन संचालक मंडळ करणार आहे.

कामगार निवृत्ती वयोमर्यादा वाढीचा प्रस्ताव फेटाळला; नवी मुंबई महापालिकेला राज्य सरकारचा दणका

राज्यातील थेट शिक्षक भरतीची होणार चौकशी; सरकार विशेष समिती स्थापन करणार

एलआयसी फसवणूक प्रकरण : CBIने दाखल केला अनिल अंबानींविरुद्ध चौथा गुन्हा

धर्माचा प्रसार करणे हा घटनात्मक अधिकार; सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Mumbai : मंत्रिमंडळ बैठकीला नरहरी झिरवाळ अनुपस्थित