राष्ट्रीय

पेटीएम पेमेंट बँकेच्या अध्यक्षांचा राजीनामा

१५ मार्चपासून पेटीएम पेमेंट बँकेला नवीन ठेवी व कर्ज देण्यास आरबीआयने बंदी घातली आहे. कारण बँकेने आवश्यक त्या नियमांची अंमलबजावणी केली

Swapnil S

नवी दिल्ली : पेटीएम पेमेंट बँकेचे अर्धवेळ अकार्यकारी अध्यक्ष विजय शेखर शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच बँकेच्या संचालक मंडळाची पुनर्रचना केली आहे.

१५ मार्चपासून पेटीएम पेमेंट बँकेला नवीन ठेवी व कर्ज देण्यास आरबीआयने बंदी घातली आहे. कारण बँकेने आवश्यक त्या नियमांची अंमलबजावणी केली नाही. पेटीएम पेमेंट बँकेने संचालक मंडळात फेरबदल केले आहेत. सेंट्रल बँकेचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन श्रीधर, माजी आयएएस अधिकारी देबेंद्रनाथ सारंगी, बँक ऑफ बडोदाचे माजी कार्यकारी संचालक अशोक कुमार गर्ग, माजी आयएएस अधिकारी रजनी सेखरी सिबल आदींची नियुक्ती संचालक मंडळावर केली.

पेटीएम ब्रँडची मालकी वन ९७ कम्युनिकेशन लिमिटेडची आहे. विजय शेखर शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे कंपनीने शेअर बाजाराला कळवले आहे. कंपनीचा संपूर्ण कारभार आता नवीन संचालक मंडळ करणार आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video