राष्ट्रीय

१०० लाख मेट्रिक टनापर्यंत साखरेच्या निर्यातीला मिळाली परवानगी

वृत्तसंस्था

साखर हंगाम २०२१-२२ (ऑक्टोबर-सप्टेंबर) दरम्यान किंमत स्थिर राखण्यासाठी सरकारने १०० लाख मेट्रिक टनापर्यंत साखरेच्या निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

डीजीएफटीने जारी केलेल्या आदेशानुसार, १ जून २०२२ पासून ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत साखर संचालनालय, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या विशिष्ट परवानगीने साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली जाईल.

साखरेच्या विक्रमी निर्यातीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. साखर हंगाम २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० मध्ये, केवळ ६.२ एलएमटी, ३८ एलएमटी आणि ५९.६० एलएमटी साखर निर्यात झाली. साखर हंगाम २०२०-२१ मध्ये ६० एलएमटीचे उद्दिष्ट होतं तर सुमारे ७० एलएमटी साखर निर्यात झाली आहे. चालू साखर हंगाम २०२१-२२ मध्ये, सुमारे 90 एलएमटी निर्यातीचे करार झाले आहेत. सुमारे ८२ एलएमटी साखर, कारखान्यांनी निर्यातीसाठी पाठवली आहे आणि जवळपास ७८ एलएमटी साखर निर्यात झाली आहे. चालू साखर हंगाम २०२१-२२ मध्ये साखरेची निर्यात सर्वोच्च आहे. साखर हंगामाच्या शेवटी साखरेचा साठा ६० ते ६५ एलएमटी राहील याची खातरजमा या निर्णयामुळे केली जाणार आहे.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण