राष्ट्रीय

... तर पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता! RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे संकेत

पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या जागतिक व्यत्ययाचा परिणाम भारतावर दिसू लागला आहे. आतापर्यंत सरकारने या दरवाढीचा मोठा भार स्वतः सोसला आहे, मात्र हे संकट असेच कायम राहिल्यास इंधन दरवाढीचा भार ग्राहकांवर टाकला जाण्याची शक्यता आहे, असे संकेत 'भारतीय रिझर्व्ह बँके'चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले.

Swapnil S

झुरिच : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या जागतिक व्यत्ययाचा परिणाम भारतावर दिसू लागला आहे. आतापर्यंत सरकारने या दरवाढीचा मोठा भार स्वतः सोसला आहे, मात्र हे संकट असेच कायम राहिल्यास इंधन दरवाढीचा भार ग्राहकांवर टाकला जाण्याची शक्यता आहे, असे संकेत 'भारतीय रिझर्व्ह बँके'चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि स्विस नॅशनल बँकेने संयुक्तपणे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चलन प्रणालीवरील १२ व्या उच्चस्तरीय परिषदेत ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असतानाही सरकारने आतापर्यंत इंधनाचे दर स्थिर ठेवले आहेत.

करांमध्ये कपात करून आणि गॅससारख्या नियंत्रित वस्तूंच्या किमतीत किरकोळ वाढ करून जनतेला दिलासा देण्यात आला आहे.

पुरवठा साखळीतील अडथळा देशासाठी धोकादायक!

भारताच्या ग्राहक किंमत निर्देशांकात (सीपीआय) अन्नाचा वाटा सुमारे ४० टक्के असल्याने पुरवठा साखळीतील अडथळे देशासाठी धोकादायक असल्याचे मल्होत्रा यांनी सांगितले. या जागतिक आणि देशांतर्गत बदलत्या परिस्थितीनुसार पतधोरण लवचिक ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

अखेर गुन्हे मागे! CJP आंदोलकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; ५ सप्टेंबरचा मोर्चा स्थगित

अतिक्रमणांवर हातोडा! मस्जिद बंदरच्या नंदलाल जानी मार्गावरील दुकाने, सिमेंट ओटे जमीनदोस्त; BMC च्या ‘बी’ वार्डाची तोडक कारवाई

OBC बैठकीतून तीन मंत्र्यांचा सभात्याग; भुजबळ, पाटील, राठोड आक्रमक

एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष सुभाष चंद्राप्रकरणी तडजोडीला स्थगिती

पक्षांतर बंदी कायदा कठोर करायला हवा!