राष्ट्रीय

निवडणूक आयोगाकडून मोदींच्या वादग्रस्त भाषणाची चौकशी सुरू

विरोधकांच्या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये केलेल्या वादग्रस्त भाषणासंदर्भात चौकशी सुरू...

Swapnil S

नवी दिल्ली : विरोधकांच्या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये केलेल्या वादग्रस्त भाषणासंदर्भात चौकशी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.

देशात जर काँग्रेस सत्तेवर आली तर ती लोकांच्या संपत्तीचे मुस्लिमांमध्ये पुनर्वितरण करेल, असे मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले होते. याबाबत कॉंग्रेसने आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.मोदींनी राजस्थानच्या बांसवाडा येथे रविवारी केलेल्या भाषणात म्हटले होते की, जर काँग्रेस सत्तेवर आली तर ती लोकांच्या संपत्तीचे मुस्लिमांमध्ये पुनर्वितरण करेल. देशाच्या संसाधनांवर अल्पसंख्याक समुदायाचा पहिला दावा आहे, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वक्तव्य केल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.

रविवारी मोदींच्या या भाषणाविरोधात काँग्रेस आणि सीपीआय-एमने स्वतंत्रपणे निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यांनी याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याची मागणीही केली. पंतप्रधानांनी केलेल्या या वादग्रस्त भाषणाची निवडणूक आयोगाने आता चौकशी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Mumbai : वीकेंडला ट्रेनने प्रवास करताय? आधीच जाणून घ्या वेळापत्रक; उद्या 'या' मार्गावर २१ तासांचा मेगाब्लॉक

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन; फ्लाइट्स कधी आणि कोणत्या मार्गांवर सुरू होणार? जाणून घ्या सविस्तर

IPLची रणधुमाळी सुरू! बंगळुरू-हैदराबाद लढतीने आजपासून १९व्या पर्वाला शानदार प्रारंभ

नवी मुंबईतून आता थेट श्रीनगर, गोवा, तिरुपती; उद्यापासून विमानसेवांचा विस्तार, तब्बल ४६ शहरांसाठी थेट सेवा

केंद्र सरकार ८.२० लाख कोटी कर्ज घेणार; महसुली तूट भरून काढण्यासाठी निर्णय