राष्ट्रीय

राजस्थानातील प्रचारसभेत भाजपवर प्रियंका गांधी यांची टीका

गरीब आणि मध्यमवर्गीयांचा विचार होत नाही, असेही प्रियंका गांधी यांनी सभेमध्ये बोलताना सांगितले.

नवशक्ती Web Desk

जयपूर : जे धर्म किंवा जातीच्या नावावर मते मागतात ते त्यांच्या कामाच्या आधारे मते मागू शकत नाहीत, असे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपवर टीका करताना सांगितले. राजस्थानच्या अजमेरमधील केकडी येथे एका निवडणूक प्रचारसभेत त्या बोलत होत्या.

लोकांनी वेगवेगळ्या पक्षांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन करून मतदान करावे, असे सांगत राजस्थानमध्ये काँग्रेस पक्ष संघटित असून भाजप वेगवेगळ्या गटात फुटलेला असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

भाजपने राज्यातील आपल्या नेत्यांना बाजूला केले आहे आणि नवीन कोणाचा तरी शोध घेत असल्याचा दावा त्यांनी केला, तर बड्या उद्योगपतींना फायदा करून देण्याचे भाजपचे धोरण आहे. यात गरीब आणि मध्यमवर्गीयांचा विचार होत नाही, असेही प्रियंका गांधी यांनी सभेमध्ये बोलताना सांगितले. राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आल्यास काँग्रेस सरकारने सुरू केलेल्या सर्व लोककल्याणकारी योजना बंद केल्या जातील, असेही प्रियंका गांधी यांनी उपस्थितांना सांगितले.

"त्यांच्या काही शंका असतील तर..."; राज ठाकरेंच्या पत्रावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उत्तर

लाडक्या बहिणींसाठी आदिती तटकरेंचा मोठा निर्णय; e-KYC मध्ये चूक झाली असेल तर...

Lionel Messi's India Tour 2025: पुतळ्याचे अनावरण, स्टेडियममध्ये राडा; कोलकात्यानंतर मेस्सी कुठे अन् कोणाला भेटणार? जाणून घ्या मेस्सीचा संपूर्ण भारत दौरा

कार्यक्रम अर्ध्यावर सोडून गेल्याने मेस्सीच्या चाहत्यांचा उद्रेक; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा माफीनामा, म्हणाल्या...

Messi Viral Video : मेस्सी आला आणि १० मिनिटांत निघून गेला...; फुटबॉलपटूच्या क्षणिक एन्ट्रीने कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर चाहत्यांचा राडा