संग्रहित छायाचित्र 
राष्ट्रीय

गांधीजींचे विचार व गरीबांचा हक्क याबद्दल मोदींना तिरस्कार; ‘मनरेगा’ नामबदलावरून राहुल गांधींचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महात्मा गांधीजींचे विचार आणि गरीबांचा हक्क या दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार आहे, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली.

Swapnil S

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महात्मा गांधीजींचे विचार आणि गरीबांचा हक्क या दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार आहे, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली. मंगळवारी सरकारने लोकसभेत एक विधेयक सादर केले, ज्यात ‘मनरेगा’चे नाव बदलून ‘विकसित भारत-जी राम जी योजना’ असे करण्याचा प्रस्ताव आहे. यावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याने लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला.

राहुल गांधी म्हणाले, ‘मनरेगा’ योजना ही महात्मा गांधींच्या 'ग्राम-स्वराज'च्या स्वप्नाचा जिवंत आविष्कार आहे. कोट्यवधी ग्रामीण लोकांच्या जीवनाचा आधार असलेली ही योजना कोविड काळात त्यांचे आर्थिक सुरक्षा कवच सिद्ध झाली. मात्र, मोदींना ही योजना नेहमीच खुपत राहिली आहे आणि गेल्या दहा वर्षांपासून ते ती कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता ते ‘मनरेगा’चे नामोनिशान मिटवण्यात येत आहे.

मोदी याच ‘मनरेगा’ योजनेत बदल करून सर्व शक्ती केवळ आपल्या हातात केंद्रित करू इच्छित आहेत. आता बजेट, योजना आणि नियम केंद्र सरकार ठरवेल, तर राज्यांना ४० टक्के खर्च उचलण्यास भाग पाडले जाईल. एवढेच नाही, तर बजेट संपल्यावर किंवा पीक काढणीच्या हंगामात दोन महिने कोणालाही काम मिळणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

हा महात्मा गांधींच्या आदर्शांचा अपमान

आधार, रोजगाराचा हक्क, जो काम मागेल त्याला काम मिळेल, गावाला विकासाचे काम स्वतः ठरवण्याचे स्वातंत्र्य आणि केंद्र सरकारकडून मजुरीचा पूर्ण खर्च आणि साहित्याच्या खर्चाचा ७५ टक्के भार, अशा मूलभूत विचारांवर ‘मनरेगा’ आधारलेली होती. मात्र, हे नवीन विधेयक महात्मा गांधींच्या आदर्शांचा अपमान असून या विधेयकाचा विरोध गावातील गल्ल्यांपासून संसदेपर्यंत केला जाईल, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला आहे.

माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट: HC कडूनही झटका; तातडीने सुनावणी घेण्यास नकार, कधीही होऊ शकते अटक

दादर स्थानकात बदलापूर-CSMT एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाही; प्रवाशांचा संताप, मोटरमनला जाब - Video व्हायरल

मी माफी का मागू?... ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या 'त्या' वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा माफी मागण्यास नकार

शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात EOW कडून मोठा धक्का

Ambernath : भाजप उमेदवारांच्या कार्यालयावर गोळीबार; परिसरात तणाव, सुरक्षा रक्षक जखमी - CCTV व्हिडिओ समोर