सत्य, अहिंसेच्या मार्गाने मोदी-संघाचे सरकार हटवू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा निर्धार Photo : X (INCIndia)
राष्ट्रीय

सत्य, अहिंसेच्या मार्गाने मोदी-संघाचे सरकार हटवू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा निर्धार

काँग्रेस पक्ष ‘सत्या’सोबत उभा आहे आणि ‘नरेंद्र मोदी-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरकार’ सत्तेतून हटवण्याचा निर्धार आम्ही केला आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी सांगितले.

Swapnil S

नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष ‘सत्या’सोबत उभा आहे आणि ‘नरेंद्र मोदी-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरकार’ सत्तेतून हटवण्याचा निर्धार आम्ही केला आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी सांगितले.

येथील रामलीला मैदानावर आयोजित ‘व्होट चोर, गद्दी छोडो’ या पक्षाच्या रॅलीला संबोधित करताना त्यांनी निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू व विवेक जोशी यांची नावे घेत, ते भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्याकडे ‘सत्ता’ आहे आणि ते ‘मतचोरी’ करतात.

निवडणुकांच्या काळात भाजपने १० हजार रुपये हस्तांतरित केले, मात्र निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. सत्य आणि असत्य यांच्यातील या लढाईत निवडणूक आयोग भाजप सरकारसोबत काम करत आहे, अशी टीका त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाला संरक्षण देणारा नवा कायदा आणला आहे. आम्ही हा कायदा बदलू आणि निवडणूक आयुक्तांविरुद्ध कारवाई करू, असा इशारा गांधी यांनी दिला.

ते म्हणाले की, आमची, हिंदुस्थान, हिंदू धर्म व जगातील प्रत्येक धर्माचे विचार हे सत्य मानते. मात्र मोहन भागवत म्हणतात, सत्याचा काहीही उपयोग नाही. सत्ता गरजेची आहे. पण, आम्ही सत्याच्या पाठीशी राहून नरेंद्र मोदी, अमित शहा व संघाच्या सरकारचा पराभव करू, याची गॅरंटी मी देतो, असे त्यांनी सांगितले.

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; मातृत्व रजेसाठी दत्तक मुलाच्या वयाची अट रद्द

राहुल गांधी यांच्या वर्तनावर नाराजी, आत्मपरीक्षणाचा सल्ला; माजी लष्करी अधिकारी, निवृत्त न्यायाधीशांचे थेट पत्र

Mumbai : पाणीप्रश्नी पालिकेत विरोधकांना बोलण्यास मज्जाव; निवेदनाची प्रत वाटप न केल्याचे दिले कारण

LPGची टंचाई नाही! छगन भुजबळ यांची विधानसभेत माहिती; राज्यात इंधन पुरवठा सुरळीत

पाकिस्तानचा काबूलवर हवाई हल्ला; ४०० ठार, २५० जखमी, बदला घेण्याचा अफगाणिस्तानचा इशारा, हल्ला अमानुष - भारताची प्रतिक्रिया