रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा पीटीआय (व्हिडिओ)
राष्ट्रीय

RBI चा सर्वसामान्यांना दिलासा; रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची कपात; EMI चा भार होणार कमी

रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व कर्जदारांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. रेपो दर २५ बेसिस पॉइंट्सने कमी करण्यात आला आहे. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज यांसारख्या सर्व प्रकारच्या कर्जांच्या EMI मध्ये घट...

Krantee V. Kale

रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व कर्जदारांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. रेपो दर २५ बेसिस पॉइंट्सने कमी करण्यात आला असून तो ५.५% वरून ५.२५% इतका झाला आहे. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज यांसारख्या सर्व प्रकारच्या कर्जांच्या EMI मध्ये घट होण्याची शक्यता आहे.

हा निर्णय आरबीआयच्या तीन दिवस चाललेल्या पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीनंतर शुक्रवारी जाहीर करण्यात आला. बैठक पूर्ण झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी नवीन व्याजदर जाहीर केले.

एमपीसीची अखेरची बैठक १ ऑक्टोबर रोजी झाली होती. त्यामध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दर ५.५% वर स्थिर ठेवला होता. यावेळी एमपीसी सदस्यांनी एकमताने रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाने निचांकी पातळी गाठलेली असताना आरबीआयच्या या निर्यणाकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

आरबीआयचे इतर प्रमुख दर - काय बदललं, काय कायम?

  • CRR: ३%

  • SDF: ५.२५%

  • MSF: ५.७५%

  • Bank Rate: ५.७५%

हे सर्व दर पूर्ववत ठेवण्यात आले आहेत.

महागाई आणि वाढ - आरबीआयचा आढावा

महागाईच्या प्रोजेक्शनमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.

  • किरकोळ महागाई (CPI) : २०२५–२६ साठी थेट २% वर

  • २०२६–२७ च्या पहिल्या तिमाहीत: ३.९% (मागील अंदाज ४.५% पेक्षा कमी)

महागाईच्या एकूण जोखमी ‘संतुलित’ असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले.

दुसरीकडे, वाढीच्या प्रोजेक्शनमध्ये मोठी सुधारणा करण्यात आली आहे:

  • वार्षिक जीडीपी प्रोजेक्शन: ६.८% वरून ७.३%

  • चालू तिमाही (Q3) प्रोजेक्शन: ६.४% वरून ६.७%

Mumbai : 'जय हो' बंद होणार? ब्रिच कँडी रहिवाशांच्या तक्रारीनंतर 'मेलोडी रोड' बंद करण्याचा निर्णय

Mumbai-Pune Expressway : 'प्रत्येक विकेंडला हीच दशा'; लोणावळ्यात महामार्गावर भीषण कोंडी, प्रवाशांचा उद्रेक

Mumbai : मिठीतील गाळ उपशाला वेग! ४ एप्रिलपासून वेगाने होणार काम; ९ लाख मेट्रिक टन गाळ उपसा करण्याचे उद्दिष्ट

४८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील 'रत्न भांडार' उघडले; दागिन्यांच्या मोजमापास सुरुवात

राज्याचे तापमान वाढणार; उष्ण व दमट हवामान; विजांसह पावसाची शक्यता