राष्ट्रीय

रिलायन्स ज्वेल्सचे व्हॅलेंटाईन डेनिमित्त नवीन कलेक्शनचे अनावरण

बऱ्याच काळापासून खऱ्या प्रेमाचा आनंद व्हॅलेंटाईन डे ला साजरा केला जातो.

Swapnil S

मुंबई : रिलायन्स ज्वेल्सने प्रेम आणि सहवासाची भावना साजरी करणाऱ्या व्हॅलेंटाईन डे ज्वेलरी कलेक्शनचे अनावरण केले आहे. या कलेक्शनमध्ये 14kt पिवळे सोने, रोझ गोल्ड आणि डायमंडमध्ये बनवलेल्या रिंग्ज, कपल बँड आणि पेंडेंट्सचा समावेश आहे. दैनंदिन पोशाखांसाठी डिझाईन केलेले असून ते जोडप्यांमधील परस्परांच्या प्रेमाची सतत आठवण करून देतात. या कलेक्शनमधील रिलायन्स ज्वेल्सच्या वेगळ्या डिझाईन्समध्ये दैनंदिन देखावा वाढवण्यासाठी शैली आणि आरामाचा समावेश आहे.

व्हॅलेंटाईन डे कलेक्शन हे स्त्री नातेसंबंधात आणणारी चमक आणि सौंदर्याची भावना टिपण्यासाठी आणि साजरी करण्यासाठी विचारपूर्वक तयार केले आहे. हे विविध जीवन प्रवासातील महिलांच्या लवचिकतेचा सन्मान करते. ठळक ते अत्याधुनिक आणि सौंदयपूर्ण डिझाइन केलेल्या दागिन्यांचे कलेक्शन महिलांच्या नातेसंबंधातील सामर्थ्य प्रतिबिंबित करते. हे रिलायन्स ज्वेल्सच्या #MyStrongerHalf या नवीन मोहिमेशी मिळतेजुळते आहे. स्त्रिया जीवनातील चढ-उतारांद्वारे त्यांच्या भागीदारांना प्रोत्साहन देतात आणि समर्थन देतात. त्यामुळे हे कलेक्शन प्रेम साजरे करण्यास प्रोत्साहन देते.

बऱ्याच काळापासून खऱ्या प्रेमाचा आनंद व्हॅलेंटाईन डे ला साजरा केला जातो. ही दागिने जोडप्यांनी सामायिक केलेले बंधन आणि त्यांचे परस्पर प्रेम आणि कौतुक यांचे प्रतिनिधित्व करते. रिलायन्स ज्वेल्स व्हॅलेंटाईन डे कलेक्शन केवळ महिलांचे सामर्थ्य आणि कर्तृत्व साजरे करत नाही तर आजच्या वेगवान जगात कृपा आणि अभिजाततेने त्यांनी बजावलेल्या विविध भूमिकांसाठी त्यांचा सन्मानही केला जातो. रिलायन्स ज्वेल्स सर्व ग्राहकांना ऑनलाईन आणि निवडक रिलायन्स ज्वेल्स आऊटलेटवर उपलब्ध असलेले भव्य कलेक्शन पाहून खरेदी करण्याचे आवाहन करते.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक