राष्ट्रीय

धार्मिक असंतुलन नजरेआड करून चालणार नाही - मोहन भागवत यांचे मत

नागपूरच्या रेशीमबाग मैदानात बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा पार पडला

वृत्तसंस्था

“देशात धर्माच्या आधारावर निर्माण होणारे लोकसंख्येचे असंतुलन यापुढे नजरेआड करून चालणार नाही. एखाद्या देशात लोकसंख्येचा असमतोल तयार होतो, तेव्हा त्या देशाच्या भौगोलिक सीमादेखील बदलून जातात. देशात लोकसंख्या धोरण तयार व्हायला पाहिजे. ते सर्वांसाठी समान पद्धतीने लागू व्हावे, अशी मागणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली आहे.

नागपूरच्या रेशीमबाग मैदानात बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा पार पडला. त्यावेळी सरसंघचालकांनी स्वयंसेवकांचे प्रबोधन केले. ते म्हणाले की, “चीनने लोकसंख्या नियंत्रण धोरण बदलून लोकसंख्यावाढीचे धोरण स्वीकारले आहे. आपल्या देशातील लोकसंख्येचा देशहिताच्या दृष्टीने विचार करता येणे शक्य आहे. आज भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. ५० वर्षांनंतर आजचा युवक वर्ग ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत दाखल होईल, तेव्हा त्यांचा सांभाळ करण्यासाठी किती तरुणांची गरज असेल याचाही विचार आपल्याला आज करावा लागेल.”

Mumbai : मेट्रो ९ आणि २बीसाठी आणखी प्रतीक्षा! उद्घाटन पुढे ढकलले; पॉड टॅक्सी, ठाणे-बोरिवली बोगदा कामालाही विलंब

Mumbai : प्रवाशांना दिलासा! मेट्रो ३ वर नवे प्रवेशद्वार सुरू; 'या' प्रमुख स्थानकांवर सुविधा

मत्स्य निर्यातीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी; कोकणच्या कोळंबीची सातासमुद्रापार मोहिनी, मच्छीमारांमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवी झेप

भारतीय रेल्वेची पहिली ‘डिजिटल रिफंड’ मोहीम सुरू; १० दिवसांत ६८ टक्के प्रकरणांचा निपटारा, QR कोडमुळे घरबसल्या परतावा

Ramayana Teaser : रणबीरचा राम अवतार पाहून चाहते भारावले; आलियानेही केलं कौतुक, म्हणाली - "जगावेगळी गोष्ट"