राष्ट्रीय

Richa Chadha controversy : अभिनेत्री रिचा चढ्ढा का ठरतेय 'देशद्रोही'? नेमके प्रकरण काय?

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चढ्ढा ही नेहमीच आपल्या बोल्ड विधानांसाठी प्रकाशझोतात असते. मात्र, यावेळी तिच्या याच स्वभावामुळे तिला देशद्रोहीदेखील म्हंटले गेले.

प्रतिनिधी

हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चढ्ढा ही नेहमी आपल्या राजकीय, सामाजिक मते सोशल माध्यमांवर मांडत असते. तिच्या या बोल्ड स्वभावामुळे अनेकवेळा चर्चेतदेखील आली आहे. मात्र, यावेळी तिच्या एका ट्विटने संपूर्ण देशात खळबळ माजली. आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी आदेश लागू करण्याचे विधान केले होते. शासनाने सांगितल्यास लष्कर पीओके परत घेण्यास तयार असून केवळ शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे, असे म्हंटले होते. यावर तिने रिट्विट करत, 'गलवान म्हणतोय हाय' असे म्हंटले आणि देशभरातून तिच्यावर टीका करण्यात आली.

भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी ट्विट करून म्हटले आहे की, " हे ट्विट अपमानजनक आहे. ते लवकर मागे घ्यायला हवे. आमच्या सशस्त्र दलांचा अपमान करणे बरोबर नाही.' असे म्हणत रिचाला धारेवर धरले. त्यांनी अभिनेत्रीला काँग्रेस आणि राहुल गांधींची पुजारी म्हणत तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील केली. निर्माते अशोक पंडित यांनी म्हंटले की, "सैनिकांची मस्करी करणाऱ्यांना हा देश कधीच माफ करणार नाही,"

देशभरातून टीका झाल्यानंतर तिच्याने माफी मागत म्हंटले की, "माझा हेतू हा कोणाचाही अपमान करण्याचा नव्हता. माझ्या या ३ शब्दांमुळे मला वादात ओढले गेले आहे. जर माझ्या शब्दांमुळे जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे माझ्या सैनिक बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करते. एवढेच नव्हे तर मला हेही सांगायचे आहे की, माझे आजोबा, मामाही सैन्यात होते. देशभक्ती ही माझ्या रक्तात आहे. देशासाठी लढताना मुलगा शहीद झाला की कुटुंबावर वाईट परिणाम होतो. सैनिक जखमी झाल्यास त्याचा काय परिणाम होतो हे मला चांगले माहीत आहे. हा माझ्यासाठी भावनिक मुद्दा आहे."

Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video

Mumbai : अंधेरीत साकारणार मीनाक्षी मंदिर; क्रांती गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

Mumbai : गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज; ३८३ कृत्रिम तलाव; १,१३२ जीवरक्षक तैनात

Mumbai : धोकादायक पुलांवर खबरदारी! गणेशोत्सवात सावधगिरीचे आवाहन; रेल्वे मार्गावरील पुलांचा समावेश

Mumbai : चेंबूरमध्ये चालत्या बेस्ट बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला, ४० प्रवासी बचावले