@INCIndia
राष्ट्रीय

Bharat Jodo : राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेत संजय राऊत सहभागी; म्हणाले, मला भरून आलं

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो (Bharat Jodo) यात्रा ही आता अंतिम टप्प्यात आली असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हेदेखील यात्रेत हजेरी लावणार

प्रतिनिधी

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता अंतिम टप्प्यात आली आहे. अशामध्ये आज त्यांची भारत जोडो यात्रा काश्मीरमध्ये पोहचली आहे. विशेष म्हणजे, या यात्रेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतदेखील सहभागी झाले होते. आज सकाळी कठुआपासून यात्रेला सुरुवात झाली, तेव्हा ते दोघेही एकत्र आले.

यावेळी ते म्हणाले की, "राहुल गांधींच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. काल सर्वांनी पाहिले की, हजारो तरुण हातात मशाली घेऊन पठाणकोटला जमले होते. खरतर, काँग्रेसचे चिन्ह मशाल नाही, ते शिवसेनेचं चिन्ह नाही. पण, तरुणांच्या हातामध्ये धगधगत्या मशाली पाहून मला भरून आलं." अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

संजय राऊत यांनी यावेळी शिवसेना ठाकरे गट हा जम्मूमध्येही निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले की, "देशात काँग्रेसला वगळून विरोधी पक्षांची आघाडी होऊच शकत नाही. काँग्रेस हा देशातील महत्त्वाचा पक्ष आहे. यामध्ये राहुल गांधींचे नेतृत्त्व तळपताना दिसते आहे. लोकं त्यांना स्वीकारत आहेत." पुढे ते म्हणाले की, "मी तुरुंगात असतानाही राहुल गांधी यांनी माझी चौकशी केली. ईडी चौकशीबाबत आम्ही आमचे अनुभव एकमेकांना सांगितले." दरम्यान, चार महिने फक्त टी शर्टवर काढले होते. मात्र, कठुआच्या थंडीपासून वाचण्यासाठी त्यांनी जॅकेट घातलेले पाहायला मिळाले. तर दुसरीकडे संजय राऊत हे गळ्यामध्ये भगव्या रंगाचा मफलर घालून यात्रेत सहभागी झाले होते.

कोठडीमुळे कामावर गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्याला पगार नाही

बस्तर सफरीवर निघालेल्या मुंबईच्या २४ वर्षीय बायकरचा अपघातात मृत्यू; १५ तासांपूर्वी केली होती 'लेट्स एक्सप्लोर बस्तर' पोस्ट

मुंबईतील स्विमिंग पुलांना पुन्हा पाणीपुरवठा; सातही धरणातील पाणीसाठा योग्य

सिद्धिविनायक मंदिर परिसराला नवी झळाळी; ७८ कोटी खर्च; भूमिगत पार्किंग, भिंतींचे स्टोन क्लॅडिंग; कामाचा १५ ऑगस्टपासून शुभारंभ

सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणणार; महसूलमंत्र्यांचे आदेश; कर्जमाफी, शासकीय योजनांचा मिळणार लाभ