राष्ट्रीय

बांगलादेशात पुन्हा शेख हसीनाच; भारताशी मैत्री कायम ठेवण्याची ग्वाही

निवडणुकीत पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग या पक्षाने संसदेतील एकूण ३०० पैकी २२३ जागा जिंकल्या.

Swapnil S

ढाका : बांगलादेशात नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विद्यमान पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग या पक्षाला पुन्हा बहुमत मिळाले आहे. त्यामुळे शेख हसीना सलग चौथ्या वेळी पंतप्रधान बनल्या आहेत. फेरनिवडीनंतर शेख हसीना यांनी भारताशी मैत्री कायम ठेवण्याची ग्वाही दिली आहे.

माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) या प्रमुख विरोधी पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता आणि निवडणुकीच्या दिवशी संप पाळला. त्यांनी सांगितले की, पक्षाने मंगळवारपासून शांततापूर्ण सार्वजनिक सहभागाच्या कार्यक्रमाद्वारे सरकारविरोधी आंदोलन तीव्र करण्याची योजना आखली आहे. सरकारने घेतलेले मतदान बोगस असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. निवडणुकीच्या आधीपासून आणि मतदानाच्या दिवशीही देशात हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या.

निवडणुकीत पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग या पक्षाने संसदेतील एकूण ३०० पैकी २२३ जागा जिंकल्या. संसदेतील प्रमुख विरोधी पक्ष जातीय पार्टीला ११ जागा मिळाल्या. बांगलादेश कल्याण पक्षाने एका मतदारसंघात विजय मिळवला तर ६२ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले. जातीय समाजतांत्रिक दल आणि वर्कर्स पार्टी ऑफ बांगलादेशने प्रत्येकी एक जागा जिंकली. स्वत: शेख हसीना यांनी गोपालगंज-३ मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला. त्या आठव्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.

“यापुढे एकनाथ शिंदेंवर टीका झाली, तर..." ; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजनांचा ठाकरे बंधूंना इशारा

बांगलादेशातील हिंसाचारावर भारत आक्रमक; परराष्ट्र मंत्रालयाकडून कारवाईची मागणी, "अल्पसंख्याकांच्या विरोधातील शत्रुत्व...

पुण्याच्या राजकारणात मोठी घडामोड! प्रशांत जगताप यांनी धरला काँग्रेसचा 'हात', पक्षाची ताकद वाढणार?

अवघ्या १० वर्षांच्या श्रवण सिंगला राष्ट्रपतींच्या हस्ते 'प्रधानमंत्री बाल पुरस्कार'; म्हणाला, "मला स्वप्नातदेखील...

"रुग्णालयानेच त्याला मारले": कॅनडामधील भारतीय व्यक्तीच्या पत्नीने सांगितला ८ तासांचा भयावह अनुभव