राष्ट्रीय

याच आठवड्यात लागणार राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल; घटनापीठाने केले जाहीर

सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांवरील सुनावणीचा निकाल लवकरच लागणार असे संकेत

प्रतिनिधी

सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर महत्त्वाची सुनावणी सुरु आहे. यासंदर्भात न्यायालयाने ही सुनावणी याच आठवड्यामध्ये संपणार असल्याची माहिती घटनापीठाने दिली आहे. त्यामुळे गेल्या ८ महिन्यांपासून सुरु असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष लवकरच संपेल अशी अशा असून हा निकाल कोणाच्या बाजूने लागतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सुनावणी सुरु असताना सरन्यायाधीश म्हणाले की, दोन्ही गटांनी परवापर्यंत आपला युक्तिवाद संपवावा. कारण, याच आठवड्यामध्ये हे प्रकरण संपवायचे आहे. यामुळे बुधवारी संध्याकाळपर्यंत शिंदे गटाचे वकील नीरज कौल आणि मनिंदर सिंग बाजू मांडणार आहेत. तर गुरुवारी दुपारपर्यंत सॉलिसिटर जनरल हरिष साळवी राज्यपालांच्या बाजूने युक्तिवाद करणार आहेत. त्यानंतर शेवटचे २ तास पुन्हा ठाकरे गटाचे वकील बाजू मांडणार आहेत. त्यामुळे आता कोणाच्या बाजूने निकाल लागणार हे लवकरच कळणार आहे.

... तरच निवडणुका घ्या! मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करण्याची मविआच्या शिष्टमंडळाची मागणी

एसटी बँकेच्या सभेत सदावर्ते गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये राडा

वसई-विरारच्या माजी आयुक्तांची अटक बेकायदा; अनिलकुमार पवार यांना हायकोर्टाचा दिलासा

फटाके फोडायचे की पावसात भिजायचे? राज्यात आजपासून पुन्हा पावसाचा इशारा

दिल्ली-एनसीआरमध्ये दिवाळीत हरित फटाक्यांना परवानगी; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश