राष्ट्रीय

झारखंडमध्ये एसयूव्ही झाडावर ;आदळल्याने सहा ठार

मृतांमध्ये सगीर अन्सारी, मोहम्मद युसूफ मिसा, इम्तियाझ अन्सारी, सुभान अन्सारी, याकूब अन्सारी आणि आफ्ताब अन्सारी यांचा समावेश आहे

नवशक्ती Web Desk

गिरिडीह : झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात बाघमारा येथे एसयूव्हीने रस्त्याच्या बाजूला असलेल्या वृक्षाला दिलेल्या जोरदार धडकेमध्ये एसयूव्हीमधील सहाजण ठार झाले. शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

या एसयूव्हीमधून प्रवास करणारे नऊ जण होते व ते विवाह समारंभाहून परत घरी जात होते. या अपघाताता पाच जण जागीच ठार झाले असून एकजण रुग्णालयात उपाचराच्यावेळी मरण पावला. अन्य जखमींमध्ये दोन मुले असून त्यांची पप्रकृती स्थिर असल्याची माहिती मुफासिल पोलीस ठाण्याचे अंमलदार कमलेश पासवान यांनी दिली.

मृतांमध्ये सगीर अन्सारी, मोहम्मद युसूफ मिसा, इम्तियाझ अन्सारी, सुभान अन्सारी, याकूब अन्सारी आणि आफ्ताब अन्सारी यांचा समावेश आहे. हे सर्व तिकोडीह येथे विवाह समारंभासाठी गेले होते ते थोरिया गावातील असून चालकाला पेंग आल्याने त्याचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज आहे.

२२ व्या वर्षी जगाचा निरोप; अभिनेत्री संचिता उगलेने राहत्या घरीच संपवलं जीवन, पोलीस तपास सुरू

अन्नभेसळ करणाऱ्यांना FDA चा दणका; वसई-विरारमध्ये १८ दुकाने सील, लाखोंचा भेसळयुक्त माल जप्त

गळ्यात साखळदंड, अंगावर चटके; पतीच्या जाचातून सुटण्यासाठी महिलेची ६ किमी पायपीट, थेट पोलीस ठाणं गाठलं

रीलमध्ये हसत-नाचत होती, पण... अभिनेत्री संचिता उगलेने उचललं टोकाचं पाऊल; शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

दिल्लीकरांना दिलासा! नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणांना सुरुवात