राष्ट्रीय

देशाच्या विकासात महाराष्ट्र अग्रेसर; स्टेट बँकेच्या अहवालातील माहिती

Swapnil S

नवी दिल्ली : कोव्हिड-१९ साथीनंतरच्या काळात देशाच्या विकासात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही राज्ये आघाडीवर असल्याचे निरीक्षण स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) त्यांच्या ताज्या अहवालात नोंदवले आहे.

कोव्हिड-१९ साथीपूर्वी देशाच्या विकासाचा (जीडीपी) दर ५.७ टक्के होता. आता तो ८.१ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे योगदान सर्वांत मोठे आहे. त्यापाठोपाठ कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश, ओदिशा, तेलंगण, सिक्कीम आणि मध्य प्रदेश ही राज्ये लक्षणीय आर्थिक गती आणि विकास दर्शवितात.

दरडोई उत्पन्नात गुजरात आघाडीवर

अहवालात अनेक राज्यांमधील दरडोई उत्पन्नातील वाढदेखील अधोरेखित केली आहे. गुजरातमध्ये सर्वाधिक म्हणजे १.९ पटींने वाढ दिसून आली आहे. गुजरात, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांनी दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत इतर राज्यांना मागे टाकले आहे. उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि मध्य प्रदेश यांसारख्या काही राज्यांनी दरडोई उत्पन्न वाढीचा वेग स्थिर ठेवला आहे, तर झारखंड, राजस्थान, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली आणि गोवा या राज्यांनी दरडोई उत्पन्न वाढीमध्ये घसरण अनुभवली आहे.

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

काय सांगता? एप्रिलमध्ये तब्बल ३ लाख लोकांनी खरेदी केली 'ही' बाईक, पाहा लिस्ट

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व