राष्ट्रीय

देशाच्या विकासात महाराष्ट्र अग्रेसर; स्टेट बँकेच्या अहवालातील माहिती

कोव्हिड-१९ साथीपूर्वी देशाच्या विकासाचा (जीडीपी) दर ५.७ टक्के होता. आता तो ८.१ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे योगदान सर्वांत मोठे आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : कोव्हिड-१९ साथीनंतरच्या काळात देशाच्या विकासात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही राज्ये आघाडीवर असल्याचे निरीक्षण स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) त्यांच्या ताज्या अहवालात नोंदवले आहे.

कोव्हिड-१९ साथीपूर्वी देशाच्या विकासाचा (जीडीपी) दर ५.७ टक्के होता. आता तो ८.१ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे योगदान सर्वांत मोठे आहे. त्यापाठोपाठ कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश, ओदिशा, तेलंगण, सिक्कीम आणि मध्य प्रदेश ही राज्ये लक्षणीय आर्थिक गती आणि विकास दर्शवितात.

दरडोई उत्पन्नात गुजरात आघाडीवर

अहवालात अनेक राज्यांमधील दरडोई उत्पन्नातील वाढदेखील अधोरेखित केली आहे. गुजरातमध्ये सर्वाधिक म्हणजे १.९ पटींने वाढ दिसून आली आहे. गुजरात, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांनी दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत इतर राज्यांना मागे टाकले आहे. उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि मध्य प्रदेश यांसारख्या काही राज्यांनी दरडोई उत्पन्न वाढीचा वेग स्थिर ठेवला आहे, तर झारखंड, राजस्थान, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली आणि गोवा या राज्यांनी दरडोई उत्पन्न वाढीमध्ये घसरण अनुभवली आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत