राष्ट्रीय

डिजीटल अरेस्टमधून ३ हजार कोटींची फसवणूक; कठोर कारवाईचा सर्वोच्च न्यायालयाचा इशारा

देशभरात डिजिटल अरेस्टच्या वाढत्या प्रकरणांमधून नागरिकांची ३ हजार कोटींची फसवणूक झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी संताप व्यक्त केला. या सायबर गुन्ह्यांवर कठोर कारवाईची गरज आहे, असेही न्यायालयाने ठणकावले.

Swapnil S

नवी दिल्ली : देशभरात डिजिटल अरेस्टच्या वाढत्या प्रकरणांमधून नागरिकांची ३ हजार कोटींची फसवणूक झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी संताप व्यक्त केला. या सायबर गुन्ह्यांवर कठोर कारवाईची गरज आहे, असेही न्यायालयाने ठणकावले.

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. सूर्यकांत, न्या. उज्जल भूयान आणि न्या. जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने या प्रकरणात न्यायालयीन मित्र नेमला आहे. याबाबतचे गृह मंत्रालय आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने सादर केलेले दोन सीलबंद अहवाल पाहिले.

खंडपीठाने निरीक्षण नोंदवले की, ‘देशभरात, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांकडून ३ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम उकळली गेली आहे, हे अत्यंत धक्कादायक आहे. जर कठोर आदेश दिले नाहीत, तर ही समस्या आणखी वाढेल. आपल्या संस्थांना बळकटी देण्यासाठी न्यायालयीन आदेशांची गरज आहे. हे गुन्हे कठोरपणे हाताळण्यास कटिबद्ध आहोत., असे खंडपीठ म्हणाले.

Goa Nightclub Fire : गोव्याच्या नाईट क्लबमध्ये भीषण आग; २३ जणांचा मृत्यू, घटनेचा थरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

Goa Nightclub Fire : आगीच्या दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त, मृतांच्या कुटुंबीयांना धीर; सरकारकडून मदतीचे आश्वासन

हिवाळी अधिवेशन ठरणार वादळी; संपूर्ण कर्जमाफी, भ्रष्टाचार, मतचोरीवरून सरकारला विरोधक घेरणार

ऑफिस सुटल्यानंतर 'नो कॉल, नो ई-मेल'; राइट टू डिस्कनेक्ट' विधेयक लोकसभेत सादर

Mumbai : आंबेडकर स्मारक २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही