राष्ट्रीय

तामिळनाडूतील काँग्रेस आमदार विजयधरानी यांचा भाजपप्रवेश

कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या विलावनकोड मतदारसंघात विजयधरानी या आमदार आहेत

Swapnil S

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असे सांगून तामिळनाडूतील सलग तीन वेळा काँग्रेसच्या आमदार असलेल्या एस. विजयधरानी यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या दक्षिणेकडील राज्यात हा काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.

कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या विलावनकोड मतदारसंघात विजयधरानी या आमदार आहेत, हा मतदारसंघ भाजपने भूतकाळात जिंकला होता. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिल्याचे पत्र एक्सवर पोस्ट केले.

राजधानी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री एल मुरुगन आणि पक्षाचे राष्ट्रीय सचिव अरविंद मेनन यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

विजयधरानी यांनी केंद्र सरकारच्या विविध चांगल्या योजनांचे कौतुक केले आणि द्रमुक-काँग्रेस आघाडीची सत्ता असलेल्या तामिळनाडूमध्ये काही योजनांची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल दु:ख व्यक्त केले.देशासाठी अनेक महान गोष्टी घडत आहेत, असे सांगून त्या म्हणाल्या की, भाजपच्या महिलांवर लक्ष केंद्रित केल्याबद्दल कौतुक केले.

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार