राष्ट्रीय

तामिळनाडूतील काँग्रेस आमदार विजयधरानी यांचा भाजपप्रवेश

Swapnil S

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असे सांगून तामिळनाडूतील सलग तीन वेळा काँग्रेसच्या आमदार असलेल्या एस. विजयधरानी यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या दक्षिणेकडील राज्यात हा काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.

कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या विलावनकोड मतदारसंघात विजयधरानी या आमदार आहेत, हा मतदारसंघ भाजपने भूतकाळात जिंकला होता. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिल्याचे पत्र एक्सवर पोस्ट केले.

राजधानी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री एल मुरुगन आणि पक्षाचे राष्ट्रीय सचिव अरविंद मेनन यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

विजयधरानी यांनी केंद्र सरकारच्या विविध चांगल्या योजनांचे कौतुक केले आणि द्रमुक-काँग्रेस आघाडीची सत्ता असलेल्या तामिळनाडूमध्ये काही योजनांची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल दु:ख व्यक्त केले.देशासाठी अनेक महान गोष्टी घडत आहेत, असे सांगून त्या म्हणाल्या की, भाजपच्या महिलांवर लक्ष केंद्रित केल्याबद्दल कौतुक केले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस