Photo : X ()
राष्ट्रीय

राजदच्या कार्यकारी अध्यक्षपदी तेजस्वी यादव यांची निवड

राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकारी अध्यक्षपदी तेजस्वी यादव यांची रविवारी येथे झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत नियुक्ती करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत राजदला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर तेजस्वी यादव यांची ही बढती झाली आहे.

Swapnil S

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकारी अध्यक्षपदी तेजस्वी यादव यांची रविवारी येथे झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत नियुक्ती करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत राजदला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर तेजस्वी यादव यांची ही बढती झाली आहे. 'महागठबंधन'ने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून पुढे करत ही निवडणूक लढवली होती.

'एक्स'वरील पोस्टमध्ये राष्ट्रीय जनता दलाने म्हटले आहे की, पक्षातील नेतृत्वाची उत्तराधिकार स्पष्ट करणारा हा निर्णय राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला तेजस्वी यादव, लालू प्रसाद आणि पक्षाचे अन्य ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

या बैठकीला तेजस्वी यादव यांची मोठी बहीण आणि पाटलीपुत्राच्या खासदार मीसा भारती याही उपस्थित होत्या. त्या या पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा

होती. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आत्मविश्वास असलेले तेजस्वी यादव सध्या विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. शनिवारी त्यांनी पक्षाच्या पदोन्नतीबाबत व्यक्त केला होता. राजद कार्यालयात कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी बूथ पातळीपासून पक्षाची रचना नव्याने घडवण्याचा विचार असल्याचे सांगितले होते.

निवडणूक पराभवासाठी तेजस्वी यादव आणि त्यांचे निकटवर्तीय राज्यसभा खासदार संजय यादव यांच्यासह यांना त्यांच्या मोठ्या बहिणी रोहिणी आचार्य यांनी थेट जबाबदार धरले होते. जबाबदारी निश्चित करण्याचा आग्रह धरल्यावर आपल्यावर शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

तेजस्वी यादव यांचे मोठे बंधू तेज प्रताप यादव, ज्यांनी २०१५ मध्ये त्यांच्यासोबत राजकीय पदार्पण केले होते, यांना गेल्या वर्षी लालू प्रसाद यांनी पक्षातून हाकलून दिले होते.

Mumbai : पावसाळ्यात समुद्रात २४ दिवस उंच लाटा उसळणार

घर, शेती शर्तभंगासाठीचे हेलपाटे थांबणार; जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना नियमितीकरणाचे अधिकार, महसूल विभागाचा निर्णय

मुंबईची आरोग्य व्यवस्था बळकट होणार; नवीन पालिका रुग्णालयात साडेचार हजार बेड्स

Mumbai : सरकारी जप्तीपेक्षा बँक आधी मालमत्ता विकू शकते; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

बदलापूर प्रकरण : पीडित मुलींच्या शिक्षणाचा खर्च सरकार करणार; दहावीपर्यंतचे प्रवेश शुल्क भरणार