राष्ट्रीय

जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांवर दहशतवादी हल्ला; १० ठार, ३३ जखमी

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सुरू असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार करून नृशंस हत्याकांड घडवले. दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारानंतर भाविकांची बस दरीत कोसळली.

Swapnil S

श्रीनगर : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सुरू असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार करून नृशंस हत्याकांड घडवले. दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारानंतर भाविकांची बस दरीत कोसळली. यात १० भाविक ठार झाले असून ३३ जण जखमी झाले आहेत. ही घटना जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात घडली.

रियासी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विशेष महाजन यांनी सांगितले की, शिवखोरी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ही बस कटरा येथे निघालेली असताना सायंकाळी ६.१५ वाजता दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केला. यानंतर बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे.

प्राथमिक अंदाजानुसार, ही बस जंगलात शिरल्यानंतर तेथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी बसवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबाराने घाबरलेल्या बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व बस दरीत कोसळली.

लष्कर, सीआरपीएफ व जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांना घेरण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. दरम्यान, घटनास्थळी मदतीसाठी रुग्णवाहिका दाखल झाल्या असून, मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. यासाठी पोलीस, लष्कर व निमलष्करी दलाच्या जवानांचीही मदत घेतली जात आहे.

ही दुर्घटना इतकी भीषण होती की, बस दरीत कोसळल्यानंतर त्यातील भाविक मोठमोठ्या दगडांवर आपटले गेले. मृतांमध्ये महिला व पुरुषांचा समावेश आहे.

रियासी जिल्ह्याचे विशेष पोलीस अधीक्षक मोहिता शर्मा यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसवर हल्ला केला. राजौरी, पूँछ व रियासी येथील उंच भागात दहशतवादी लपल्याचे सूत्रांनी सांगितले.

Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 Live Updates : निवडणुकांमध्ये बाजी कोणाची? कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?

Thane : अवैध बांधकाम केल्यास नगरसेवक पद जाणार; निवडणुकीपूर्वी उमेदवारांना द्यावे लागणार शपथपत्र

आता टोल नाक्यांवर AI; जाता येणार ८०च्या वेगाने; थांबण्याची, ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी

महाराष्ट्राच्या आजवरच्या राजकारणातील 'हेल्दी' संबंध संपले; भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांची खंत

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण : पार्थ पवार यांच्या सहीचे बनावट पत्र व्हायरल; आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल