राष्ट्रीय

मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन संपवणार नाही, शेतकऱ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा, पंधेर म्हणाले...

शंभू बॉर्डर पॉईंटवर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की ते २९ फेब्रुवारी रोजी त्यांच्या पुढील कृतीची घोषणा करू

Swapnil S

चंदिगड : दिल्ली चलो'च्या हाकेमध्ये सहभागी झालेले शेतकरी त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन संपवणार नाहीत, असे शेतकरी नेते सर्वनसिंग पंधेर यांनी शनिवारी स्पष्ट केले. किमान आधारभूत किंमतीची कायदेशीर हमी यासह विविध मागण्यांसाठी केंद्रावर दबाव आणण्यासाठी हजारो शेतकरी त्यांच्या ट्रॅक्टर-ट्रॉली आणि ट्रकसह हरयाणाच्या पंजाबच्या सीमेवरील खनौरी आणि शंभू पॉइंट्सवर थांबले आहेत. त्यांना तेथे सुरक्षा दलांनी रोखले होते.

शंभू बॉर्डर पॉईंटवर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की ते २९ फेब्रुवारी रोजी त्यांच्या पुढील कृतीची घोषणा करू. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार हे निश्चित आहे. जर केंद्राने उद्या आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही आंदोलनाबाबत निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.

Delhi Crime : मदतीच्या बहाण्याने बसमध्ये घेतलं अन्...; १६ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, चालक-कंडक्टर अटकेत

Mumbai : पालिका सुधार समितीत महायुतीत खदखद; भाजप नगरसेवकांची पक्षनेतृत्वाकडे तक्रार

शाळांमध्ये ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’; घर आणि शाळा यांच्यात समन्वय वाढ‌वणार, वर्षातून चार वेळा आयोजन

Mumbai : ‘डोंगरीचा राजा’, ‘धारावीचा चिंतामणी’चे उत्साहात आगमन; ढोल-ताशांचा गजर, भाविकांची गर्दी

Mumbai : पाणी तुंबण्याची समस्या दूर होणार; मिलन सबवेच्या धर्तीवर मानखुर्द सबवेत पंपिंग स्टेशन उभारणार, १४ कोटी खर्च करणार