राष्ट्रीय

मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन संपवणार नाही, शेतकऱ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा, पंधेर म्हणाले...

शंभू बॉर्डर पॉईंटवर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की ते २९ फेब्रुवारी रोजी त्यांच्या पुढील कृतीची घोषणा करू

Swapnil S

चंदिगड : दिल्ली चलो'च्या हाकेमध्ये सहभागी झालेले शेतकरी त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन संपवणार नाहीत, असे शेतकरी नेते सर्वनसिंग पंधेर यांनी शनिवारी स्पष्ट केले. किमान आधारभूत किंमतीची कायदेशीर हमी यासह विविध मागण्यांसाठी केंद्रावर दबाव आणण्यासाठी हजारो शेतकरी त्यांच्या ट्रॅक्टर-ट्रॉली आणि ट्रकसह हरयाणाच्या पंजाबच्या सीमेवरील खनौरी आणि शंभू पॉइंट्सवर थांबले आहेत. त्यांना तेथे सुरक्षा दलांनी रोखले होते.

शंभू बॉर्डर पॉईंटवर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की ते २९ फेब्रुवारी रोजी त्यांच्या पुढील कृतीची घोषणा करू. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार हे निश्चित आहे. जर केंद्राने उद्या आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही आंदोलनाबाबत निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.

माल पोहोचल्याची आता डिजिटल नोंद; ई-वे बिल पोर्टलवर सुविधा सुरू

पारलेने 'मेलोडी'चे उत्पादन वाढविले...पंतप्रधान मोदींनी मेलोनी यांना दिलेल्या 'चाॅकलेट भेटी'नंतर मागणीत वाढ

...तर पॅरोल नाकारणे घटनाबाह्य! मुंबई उच्च न्यायालयाचा कैद्यांच्या हक्कासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यसभेच्या जागेसाठी १८ जूनला पोटनिवडणूक; सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर निवडणूक आयोगाची घोषणा

Pune : नसरापूर अत्याचारप्रकरणी २८ मे रोजी दोषारोप ठेवणार