राष्ट्रीय

BalasoreTrainTragedy ; बालासोर रेल्वे वाहतूक पूर्ववत, देवेंद्र फडणवीसांचे ट्विट चर्चेत

वैष्णव यांच्या स्वत:च्या ट्विटर हँडलने बालासोर रेल्वे स्थानकापर्यंतच्या डाऊन मार्गावरील वाहतूक सुरू झाल्याचा व्हिडिओ ट्विट केला

नवशक्ती Web Desk

४८ तासांहून अधिक काळ वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर अखेर रविवारी रात्री उशिरा ओडिशाच्या बालासोर रेल्वे स्थानकावर वाहतूक पूर्ववत झाली. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते. एकीकडे विरोधक ओडिशातील दुर्घटनेसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरत असताना दुसरीकडे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे अश्विनी वैष्णव यांचा रेल्वेसमोर हात जोडलेला फोटो व्हायरल होत आहे. वैष्णव यांच्या स्वत:च्या ट्विटर हँडलने बालासोर रेल्वे स्थानकापर्यंतच्या डाऊन मार्गावरील वाहतूक सुरू झाल्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. 

बालासोर येथे शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता झालेल्या भीषण तिहेरी रेल्वे अपघातात २८८ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय शेकडो जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर अपघाताचे कारण शोधले जात असून, तांत्रिक बिघाड की मानवी बेजबाबदारपणामुळे हा अपघात झाला आहे, याचा शोध घेतला जात आहे. 

दरम्यान, अश्विनी वैष्णव यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिचे कौतुक केले आहे. “अश्विनीजी, या सगळ्या गोंधळात तुम्ही अक्षरशः उभे राहिलात. रेल्वे सेवा पूर्ववत होईपर्यंत तुम्ही तिथेच थांबलात. ते अतिशय उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे. तुमच्यासारखे नेते जनतेची सेवा करत आहेत हे देशाचे भाग्य आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

IND vd ENG ICC T20 WC26 : भारताची सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक; वानखेडेवर रंगलेल्या थरारक उपांत्य सामन्यात इंग्लंडवर ७ धावांनी सरशी

आजचे राशिभविष्य, ६ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

मार्च महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

काँग्रेसचा शरणागतीचा इतिहास कसा विसरता!

तेंडुलकर कुटुंबात सनई-चौघडे! अर्जुन तेंडुलकर-सानिया चंडोक विवाहबद्ध; राजकारणी ते बॉलिवूड दिग्गजांची उपस्थिती