राष्ट्रीय

मणिपूरमध्ये दोन बिहारी मजुरांची हत्या; एक अतिरेकी ठार, ६ दहशतवाद्यांना अटक

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला असून, शनिवारी संध्याकाळी काकचिंगमध्ये दहशतवाद्यांनी दोन मजुरांची गोळ्या झाडून हत्या केली. दोन्ही मजूर बिहारच्या गोपालगंज येथील रहिवासी होते.

Swapnil S

इंफाळ : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला असून, शनिवारी संध्याकाळी काकचिंगमध्ये दहशतवाद्यांनी दोन मजुरांची गोळ्या झाडून हत्या केली. दोन्ही मजूर बिहारच्या गोपालगंज येथील रहिवासी होते. दऱम्यान, मणिपूरच्या थौबलमध्ये एका अतिरेकी गटाची पोलिसांशी झालेल्या चकमकीत एका अतिरेक्याचा मृत्यू झाला, तर पोलिसांनी ६ दहशतवाद्यांना अटक केली.

शनिवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास काकचिंग-वाबगाई रोडवरील केरक येथील पंचायत कार्यालयाजवळ काम आटोपून सदर दोन मजूर सायकलवरून घरी परतत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी दोन्ही मजुरांना रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. सुनालाल कुमार (१८) आणि दशरथ कुमार (१७) अशी या मजुरांची नावे आहेत, ते गोपालगंजमधील राजवाही गावचे रहिवासी आहेत.

दुसरीकडे, मणिपूरच्या थौबलमध्ये एका अतिरेकी गटाची पोलिसांशी चकमक झडली. यामध्ये एका अतिरेक्याचा मृत्यू झाला, तर पोलिसांनी ६ दहशतवाद्यांना q संमिश्र पानावर

दर्जाहीन कृत्रिम वाळूवर टाच! एम-सँड धोरणात मोठी सुधारणा; अंमलबजावणीचे अधिकार शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना; निर्णय जारी

Mumbai News : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर BMC मेहेरबान; रेल्वेकडे ५०० कोटी रुपयांचे पाणी बिल थकीत!

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या निधीची चौकशी होणार; राज्य सरकारकडून निधी तपासण्याचे आदेश

महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले; ठाण्यातील ‘त्या’ फलकाची चर्चा!

कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारला हायकोर्टाचा दणका; ‘आरएसएस’ला लक्ष्य करण्याच्या निर्णयाला स्थगिती