राष्ट्रीय

मणिपूरमध्ये दोन बिहारी मजुरांची हत्या; एक अतिरेकी ठार, ६ दहशतवाद्यांना अटक

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला असून, शनिवारी संध्याकाळी काकचिंगमध्ये दहशतवाद्यांनी दोन मजुरांची गोळ्या झाडून हत्या केली. दोन्ही मजूर बिहारच्या गोपालगंज येथील रहिवासी होते.

Swapnil S

इंफाळ : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला असून, शनिवारी संध्याकाळी काकचिंगमध्ये दहशतवाद्यांनी दोन मजुरांची गोळ्या झाडून हत्या केली. दोन्ही मजूर बिहारच्या गोपालगंज येथील रहिवासी होते. दऱम्यान, मणिपूरच्या थौबलमध्ये एका अतिरेकी गटाची पोलिसांशी झालेल्या चकमकीत एका अतिरेक्याचा मृत्यू झाला, तर पोलिसांनी ६ दहशतवाद्यांना अटक केली.

शनिवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास काकचिंग-वाबगाई रोडवरील केरक येथील पंचायत कार्यालयाजवळ काम आटोपून सदर दोन मजूर सायकलवरून घरी परतत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी दोन्ही मजुरांना रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. सुनालाल कुमार (१८) आणि दशरथ कुमार (१७) अशी या मजुरांची नावे आहेत, ते गोपालगंजमधील राजवाही गावचे रहिवासी आहेत.

दुसरीकडे, मणिपूरच्या थौबलमध्ये एका अतिरेकी गटाची पोलिसांशी चकमक झडली. यामध्ये एका अतिरेक्याचा मृत्यू झाला, तर पोलिसांनी ६ दहशतवाद्यांना q संमिश्र पानावर

ग्रँड मुफ्तींच्या प्रयत्नांना यश; निमिषा प्रियाला मोठा दिलासा, येमेन सरकारकडून फाशी तुर्तास स्थगित

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी