राष्ट्रीय

गहू चोरल्याच्या आरोपावरून तीन दलित मुलांचे मुंडण करून गावातून काढली धिंड; तिघांना अटक, एकजण फरार

पाच किलो गहू चोरल्याच्या आरोपावरून पोल्ट्री फार्मच्या दोघा मालकांनी तीन दलित मुलांचे मुंडण करून आणि त्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची धिंड काढल्याचा प्रकार

Swapnil S

बहराइच : पाच किलो गहू चोरल्याच्या आरोपावरून पोल्ट्री फार्मच्या दोघा मालकांनी तीन दलित मुलांचे मुंडण करून आणि त्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची धिंड काढल्याचा प्रकार येथील एका गावात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदर तीन मुले कामावर हजर न झाल्याने दोघा पोल्ट्री मालकांनी त्यांचा छळ केला, असा आरोप पीडित मुलांच्या कुटुंबीयांनी केला आहे. ताजपुर तेडिया गावात हा प्रकार घडला. दोघा मालकांनी १२-१४ वर्षे वयोगटातील मुलांचे मुंडण केले, त्यांच्या तोंडाला काळे फासले, त्यांच्या हातावर चोर असे लिहिले आणि हात बांधून गावात त्यांची धिंड काढली, असे पोलिसांनी सांगितले.

पीडित मुलांच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून नझीम खान, कासम खान, इनायत आणि सानू या चार आरोपींविरुद्ध बुधवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सानू हा फरार झाला असून अन्य तिघांना अटक करण्यात आली आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक