राष्ट्रीय

गहू चोरल्याच्या आरोपावरून तीन दलित मुलांचे मुंडण करून गावातून काढली धिंड; तिघांना अटक, एकजण फरार

पाच किलो गहू चोरल्याच्या आरोपावरून पोल्ट्री फार्मच्या दोघा मालकांनी तीन दलित मुलांचे मुंडण करून आणि त्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची धिंड काढल्याचा प्रकार

Swapnil S

बहराइच : पाच किलो गहू चोरल्याच्या आरोपावरून पोल्ट्री फार्मच्या दोघा मालकांनी तीन दलित मुलांचे मुंडण करून आणि त्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची धिंड काढल्याचा प्रकार येथील एका गावात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदर तीन मुले कामावर हजर न झाल्याने दोघा पोल्ट्री मालकांनी त्यांचा छळ केला, असा आरोप पीडित मुलांच्या कुटुंबीयांनी केला आहे. ताजपुर तेडिया गावात हा प्रकार घडला. दोघा मालकांनी १२-१४ वर्षे वयोगटातील मुलांचे मुंडण केले, त्यांच्या तोंडाला काळे फासले, त्यांच्या हातावर चोर असे लिहिले आणि हात बांधून गावात त्यांची धिंड काढली, असे पोलिसांनी सांगितले.

पीडित मुलांच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून नझीम खान, कासम खान, इनायत आणि सानू या चार आरोपींविरुद्ध बुधवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सानू हा फरार झाला असून अन्य तिघांना अटक करण्यात आली आहे.

Mumbai : ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा अन् नववर्षाचा जल्लोष; मुंबई, ठाणे, डोंबिवलीत गुढीपाडव्याच्या भव्य शोभायात्रा

Air Travel Alert : प्रवाशांनो लक्ष द्या! 'या' ४ विमानतळांवर बंदी; फ्लाइट्सवर होणार परिणाम

अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याचे दर वाढण्याची शक्यता; ग्राहकांच्या खरेदी धोरणावर परिणाम होणार

Nagpur : मॅट्रिमोनियल साईटवरील ओळख महागात पडली; मॉर्फ अश्लील व्हिडिओने ३६ वर्षीय व्यक्तीला ब्लॅकमेल

भिवंडीत फर्निचर मार्केटला भीषण आग; अनेक दुकाने जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली