राष्ट्रीय

गहू चोरल्याच्या आरोपावरून तीन दलित मुलांचे मुंडण करून गावातून काढली धिंड; तिघांना अटक, एकजण फरार

पाच किलो गहू चोरल्याच्या आरोपावरून पोल्ट्री फार्मच्या दोघा मालकांनी तीन दलित मुलांचे मुंडण करून आणि त्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची धिंड काढल्याचा प्रकार

Swapnil S

बहराइच : पाच किलो गहू चोरल्याच्या आरोपावरून पोल्ट्री फार्मच्या दोघा मालकांनी तीन दलित मुलांचे मुंडण करून आणि त्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची धिंड काढल्याचा प्रकार येथील एका गावात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदर तीन मुले कामावर हजर न झाल्याने दोघा पोल्ट्री मालकांनी त्यांचा छळ केला, असा आरोप पीडित मुलांच्या कुटुंबीयांनी केला आहे. ताजपुर तेडिया गावात हा प्रकार घडला. दोघा मालकांनी १२-१४ वर्षे वयोगटातील मुलांचे मुंडण केले, त्यांच्या तोंडाला काळे फासले, त्यांच्या हातावर चोर असे लिहिले आणि हात बांधून गावात त्यांची धिंड काढली, असे पोलिसांनी सांगितले.

पीडित मुलांच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून नझीम खान, कासम खान, इनायत आणि सानू या चार आरोपींविरुद्ध बुधवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सानू हा फरार झाला असून अन्य तिघांना अटक करण्यात आली आहे.

Nerul–Mumbai Ferry : फक्त ३० मिनिटांत मुंबई! १५ डिसेंबरपासून नेरुळ-भाऊचा धक्का फेरी सुरू होणार; भाडे किती? जाणून घ्या डिटेल्स

Goa Nightclub Fire Update : लुथ्रा बंधू थायलंडच्या फुकेतमधून ताब्यात; भारतात आणण्यासाठी अधिकाऱ्यांची टीम रवाना

लाज आणली! महिला डॉक्टरांचा स्पर्श व्हावा यासाठी आजारपणाचं नाटक; कॅनडात भारतीय वंशाच्या तरुणाला अटक

IND vs SA : सूर्यकुमारच्या कामगिरीची चिंता! भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज मुल्लानपूर येथे रंगणार दुसरा टी-२० सामना

परदेशी वारीसाठी ६० कोटी रुपये जमा करा, अन्यथा बँक गॅरंटी द्या; राज कुंद्रा - शिल्पा शेट्टीला उच्च न्यायालयाने सुनावले