राष्ट्रीय

गहू चोरल्याच्या आरोपावरून तीन दलित मुलांचे मुंडण करून गावातून काढली धिंड; तिघांना अटक, एकजण फरार

पाच किलो गहू चोरल्याच्या आरोपावरून पोल्ट्री फार्मच्या दोघा मालकांनी तीन दलित मुलांचे मुंडण करून आणि त्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची धिंड काढल्याचा प्रकार

Swapnil S

बहराइच : पाच किलो गहू चोरल्याच्या आरोपावरून पोल्ट्री फार्मच्या दोघा मालकांनी तीन दलित मुलांचे मुंडण करून आणि त्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची धिंड काढल्याचा प्रकार येथील एका गावात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदर तीन मुले कामावर हजर न झाल्याने दोघा पोल्ट्री मालकांनी त्यांचा छळ केला, असा आरोप पीडित मुलांच्या कुटुंबीयांनी केला आहे. ताजपुर तेडिया गावात हा प्रकार घडला. दोघा मालकांनी १२-१४ वर्षे वयोगटातील मुलांचे मुंडण केले, त्यांच्या तोंडाला काळे फासले, त्यांच्या हातावर चोर असे लिहिले आणि हात बांधून गावात त्यांची धिंड काढली, असे पोलिसांनी सांगितले.

पीडित मुलांच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून नझीम खान, कासम खान, इनायत आणि सानू या चार आरोपींविरुद्ध बुधवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सानू हा फरार झाला असून अन्य तिघांना अटक करण्यात आली आहे.

PF क्लेम रिजेक्ट होऊ नये म्हणून आत्ताच करा 'हे' काम; EPFO चा सल्ला

डाबरच्या 'या' उत्पादनांवर FSSAI ची बंदी; ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आरोप

'हवेतच २-३ मिनिटं विमान हेलकावलं'; थायलंडहून येणाऱ्या एअर इंडिया फ्लाइटमध्ये प्रवाशांचा थरकाप, Video

Pune : कौटुंबिक वादातून संतापजनक कृत्य! ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात टाकलं फेव्ही क्विक

मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार? Jio, Airtel आणि Vi ग्राहकांसाठी मोठी अपडेट