राष्ट्रीय

हिंसाचार वाढवण्यासाठी न्यायालयाचा वापर नको

मणिपूरप्रश्नी सरन्यायाधीशांचे वक्तव्य

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचार वाढवण्यासाठी न्यायालयाचा वापर केला जाता कामा नये. न्यायालय केवळ निर्देश देऊ शकते. प्रत्यक्ष कायदा-सुव्यवस्था निर्माण करू शकत नाही, असे विधान देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सोमवारी केले. मणिपूरमधील हिंसाचारासंबंधी विविध याचिकांची सुनावणी करताना त्यांनी हे वक्तव्य केले.

सर्वोच्च न्यायालय परिस्थितीचे निरीक्षण करू शकते आणि ती सुधारण्यासाठी काही निर्देश देऊ शकते. पण प्रत्यक्ष कायदा-सुव्यवस्था निर्माण करण्याचे काम करू शकत नाही. मणिपूरमधील हिंसाचार वाढवण्यासाठी न्यायालयाचा वापर केला जाता कामा नये, असे चंद्रचूड यांनी म्हटले.

दरम्यान, राज्यात गेले दोन महिने सुरू असलेला हिंसाचार सोमवारीही कायम होता. मणिपूरच्या वेस्ट कांगपोक्पी भागात झालेल्या हिंसाचारात एक पोलीस कर्मचारी मारला गेला, तर अन्य १० जण जखमी झाले.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली