Photo : ANI
राष्ट्रीय

वैष्णोदेवी यात्रा पूर्णपणे थांबवली; भाविकांना परत जाण्याचे आवाहन

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड आणि कठुआमध्ये झालेली ढगफुटी तसेच भूस्खलनाच्या सततच्या घटनांमुळे जम्मूच्या कटरा येथे वैष्णोदेवीची यात्रा पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. भाविकांना परत जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Swapnil S

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड आणि कठुआमध्ये झालेली ढगफुटी तसेच भूस्खलनाच्या सततच्या घटनांमुळे जम्मूच्या कटरा येथे वैष्णोदेवीची यात्रा पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. भाविकांना परत जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याठिकाणी नवीन प्रवाशांना यात्रेसाठी प्रवेश मिळू नये म्हणून ट्रॅव्हल स्लिप काऊंटरदेखील बंद करण्यात आले आहेत. यात्रेकरूंच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रशासनाने कटरा बाजारात फिरण्यासही बंदी घातली आहे. यात्रेसाठी आधीच निघालेल्या भाविकांनाही लवकरात लवकर कटरा येथे परतण्याचे आवाहन केले जात आहे. यासाठी कोणत्याही अनुचित घटना टाळता याव्यात, यासाठी लाऊडस्पीकरद्वारे सतत घोषणा दिल्या जात आहेत.

Mumbai : 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ होणार कमी

टीएमटीच्या ताफ्यात पहिली डबलडेकर ई-बस दाखल

Pune : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; खंडाळा घाटात वाहनांच्या रांगा, खासदार सुप्रिया सुळेही दोन तास अडकल्या, VIDEO

Navi Mumbai : डीपीशेजारी कचरा टाकू नका, गाड्या पार्क करू नका; महावितरणचे आवाहन

मानखुर्दमध्ये क्रेन दुर्घटना : कंत्राटदाराला एक कोटींचा दंड