राष्ट्रीय

मणिपूर पुन्हा पेटले

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा मणिपूरमध्ये हिंसाचाराचा उद्रेक झाला.

Swapnil S

इम्फाळ : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा मणिपूरमध्ये हिंसाचाराचा उद्रेक झाला. मणिपूरच्या जिरिबाम जिल्ह्यात संशयित अतिरेक्यांनी एका पोलीस चौकीला आग लावली असून अनेक घरेही पेटवून दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अतिरेक्यांनी एका व्यक्तीची हत्या केल्यानंतर हिंसाचाराचा उद्रेक झाला. बराक नदीच्या तीरावर असलेल्या छोटोबेकरा परिसरातील जिरी पोलीस चौकीला दहशतवाद्यांनी आग लावली. बंदूकधारी संशयित डोंगराळ भागातील अतिरेकी असून त्यांनी अंधाराचा फायदा घेत लामताई खुनोऊ, मोधुपूर परिसरातील अनेक घरांना आगी लावल्या. अतिरेक्यांविरुद्धच्या मोहिमेत सहकार्य करण्यासाठी मणिपूर पोलिसांच्या कमांडोंना हवाई मार्गाने जिरिबाम येथे आणण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, जिरिबाम जिल्ह्यातील २३९ महिला आणि लहान मुलांना त्यांच्या गावातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. जिरिबाम जिल्ह्यात मैतेई, कुकी, मुस्लिम, नागा आणि बिगर मणिपुरी अशी वांशिक विविधता असून या जिल्ह्यास आतापर्यंत हिंसाचाराची झळ बसली नव्हती. इम्फाळ खोऱ्यातील मैतेई आणि डोंगराळ भागातील कुकी यांच्यातील वांशिक संघर्षामुळे आतापर्यंत २०० हून अधिक बळी गेले असून हजारो लोक बेघर झाले आहेत.

अटल पेन्शनचे केंद्रीकरण चिंताजनक; बँकांनी ग्राहकांना पेन्शन स्लॅबसाठी प्रवृत्त करावे - वित्तीय सेवा विभाग सचिव एम. नागराजू

मुंबईकरांसाठी खुशखबर! गोराईत महाराष्ट्रातील पहिल्या मँग्रोव्ह पार्कचं २८ मे रोजी उद्घाटन; पर्यावरण पर्यटनाला मिळणार चालना

Mumbai : वांद्र्यातील गरीब नगर पाडकाम ८५ टक्के पूर्ण; "मानवी दृष्टिकोन ठेवून कारवाई," पश्चिम रेल्वेचं स्पष्टीकरण

नवी मुंबईत ५०४ इमारती धोकादायक; ५२ इमारती अतिधोकादायक; विभागवार सर्वेक्षणानंतर यादी जाहीर

वाढत्या तापमानामुळे कांदा सडतोय; कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त