राष्ट्रीय

पश्चिम बंगालच्या वनमंत्र्यांना ईडीकडून पहाटे साडेतीन वाजता अटक ; ममता बॅनर्जींचा संतापल्या...

ज्योतिप्रिय मलिक हे खाद्यमंत्री असताना मोठा ध्यान्य घोटाळा झाल्याचं ईडीचं म्हणणं आहे

नवशक्ती Web Desk

देशातील पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणूक पार पडत आहेत. असं असताना केंद्रीय यंत्रणांचा गैरवाप केला जात असल्याचा आरोप विरोधीपक्षांकडून केला जात आहे. देशातील अनेक राज्याती ईडीने कारवाई करायला सुरुवाक केली आहे. ईडीने कारवाई करण्याच्या टायमिंगवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. नुकतंच, ईडीने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत यांना समन्स पाठवलं आहे. त्याशिवाय राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्या संपत्तीवर देखील छापेमारी केली आहे. त्यांनंतर आता ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांच्याविरोधात देखील ईडीने कारवाई केली आहे. रेशन घोटाळाप्रकरणी मलिक यांना ईडीने अटक केली आहे.

ज्योतिप्रिय मलिक हे माजी खाद्यमंत्री असून सध्याच्या ममता सरकारमधघ्ये नवमंत्री आहेत. गुरुवारी दिवसभर चौकशी केल्यानंतर पहाटेच्या सुमारास ईडीने त्यांवर अटकेची कारवाई केली. शुक्रवारी सकाळी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ज्योतिप्रिय मलिक यांना अटक केल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच ईडीविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा देखील दिला होता.

त्यापूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोलकात्यातील साल्ट लेक भागात वनमंत्री मलिक यांच्या दोन फ्लॅटवर छापा टाकला होता. तसंच मलिक यांच्यासंबंधित अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. ज्योतिप्रिय मलिक हे खाद्यमंत्री असताना मोठा ध्यान्य घोटाळा झाल्याचं ईडीचं म्हणणं आहे. दरम्यान, ज्यातिप्रिय मलिक यांना अटक केल्यानंतर ईडीने त्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी ईएसआयच्या रुग्णालयात नेले आहे.

पश्चिम बंगालचे मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांच्या ठिकाणांवर ईडीने छापेमारी केल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईडीवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. ज्योतिप्रिय यांची पृकृती बरी नाही. ईडीच्या छापेमारीनंतर त्यांना काही झालं तर मी गुन्हा दाखल करेन, एवढच नाहीस भाजपला 'सबका साथ सबका विकास' हवा आहे असं म्हणतात. पण प्रत्यक्षात याचा अर्थ 'सबका साथ सबका विनाश' असा आहे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

शक्तिपीठ महामार्गात बदलाचे संकेत; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षणासाठी उच्चस्तरीय समिती; मुंबई उच्च न्यायालयाकडून समिती स्थापन

शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर आगामी निवडणुका होऊ देणार नाही! मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला इशारा

आम्ही खूप झगडलो, पण ही फार दुर्दैवी गोष्ट! लोकपाल सदस्यांना BMW देण्यावरून अण्णा हजारे नाराज

मोदींनी पुन्हा एकदा ट्रम्प यांची भेट टाळली; 'आसियान' शिखर परिषदेला आभासी पद्धतीने उपस्थित राहणार