राष्ट्रीय

WhatsApp Ban : सप्टेंबरमध्ये व्हॉट्सॲपने भारतातील २६.८५ लाख अकाउंट का केले बंद?

व्हॉट्सॲपने भारतीय यूजर्सच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तक्रार आणि निवारण विभाग सुरू केला आहे.

प्रतिनिधी

भारतामध्ये सर्वाधिक व्हॉट्सॲप (WhatsApp) युझर्स असतानादेखील सप्टेंबरमध्ये २६.८५ लाख अकाउंट्स बंद केले आहेत. व्हॉट्सॲप इंडियाने मासिक अहवाल जारी केला असून त्यामध्ये ही माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी सांगितले की, सप्टेंबर महिन्यात कंपनीकडे ६६६ तक्रारी करण्यात आल्या. नवीन माहिती तंत्रज्ञान कायदा, २०२१च्या नियमानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

तक्रार आणि निवारण विभागाला प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर या अकाउंट्सवर बंदी घातल्याचे कंपनीने स्पष्ट केले. यूजर्सच्या सुरक्षा आणि गोपनियतेला प्राथमिकता देणे हा व्हॉट्सॲपचा प्रमुख उद्देश आहे, असे कंपनीने आपल्या अहवालात सांगितले आहे. यातील मेसेंजिंग सिस्टमचा दुरुपयोग थांबवण्यासाठी एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड बनवण्यात आलेले आहे.

व्हॉट्सॲपने भारतीय यूजर्सच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तक्रार आणि निवारण विभाग सुरू केला आहे. त्यामध्ये इंजिनिअर्स, टेक्निशियन, संशोधक, कायदेतज्ज्ञ आणि इतर क्षेत्रातले तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. व्हॉट्सॲप यूजर्सला वारंवार स्पॅम मेसेज पाठवल्यास त्याची तक्रार करता येते. त्यानंतर व्हॉट्सॲपकडून संबंधित अकाउंटवर कारवाई करण्यात येते.

व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली; बचावकार्य युद्धपातळीवर, दूतावासाकडून हेल्पलाइन सुरू

PF खातेधारकांनो लक्ष द्या! UAN सक्रिय नसेल तर EPFO च्या अनेक सुविधा वापरता येणार नाहीत; 'या' स्टेप्स फॉलो करा

बेसमेंटमध्ये विवस्त्र अवस्थेत आढळला ७ वर्षीय चिमुरडीचा मृतदेह; अत्याचारानंतर हत्येचा आरोप

Swiggy Instamart अडचणीत; मुदत संपलेल्या आणि खराब झालेल्या अन्नपदार्थांच्या तक्रारींवर FSSAI ची कारवाई

प्रायव्हसीवरून वाद वाढताच मेटाचा यू-टर्न! इंस्टाग्रामवरील 'Muse Image' AI फीचर बंद