नवी मुंबई

एपीएमसीत भाज्यांच्या दरात १० ते १२ टक्क्यांनी वाढ

प्रतिनिधी

नवी मुंबईतील वाशी एपीएमसी बाजारात गेल्या दोन दिवसांपासून भाज्यांच्या दरात १० ते १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अवकाळी पाऊस आणि अतिउष्णतेमुळे भाज्यांचे उत्पादन घटले आहे. याचाच परिणाम म्हणून दरात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये हिरवा वाटाणा, शिमला मिरची या भाज्यांचा समावेश आहे.

एपीएमसी बाजारात मंगळवार २५ एप्रिल रोजी ५९४ गाड्यांची आवक झाली. यामध्ये काकडी ३९२ क्विंटल आवक, शिमला मिरची १४८२ क्विंटल, फरसबी ७६ क्विंटल, वांगी ३२३ क्विंटल, वाटाणा १०४५ क्विंटल, आवक झाली आहे. तर टोमॅटो, गवार, भेंडी, कोबी, फ्लॉवर, गाजराचे दर स्थिर असून हिरवी मिरची, हिरवा वाटाणा दर उतरले आहेत. तर शिमला मिरची, वांगी, फरसबी, काकडीच्या दरांनी उसळी घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी घाऊक बाजारात फरसबी प्रतिकिलो ४०-४५ रुपयांनी उपलब्ध होती. त्यामध्ये १० रुपयांची वाढ झाली असून आता ५०-५५ रुपयांनी विक्री होत आहे. प्रतिकिलो शिमला मिरची आधी २०-२२ रु होती ती आता ३०-३२ रुपयांनी विकली जात असल्याचे व्यापारी भाऊसाहेब गायकवाड यांनी सांगितले.

दर प्रतिकिलो प्रमाणे :

भाज्या आता आधी

काकडी १६ -१८ १२ -१४

शिमला मिरची ३०- ३२ २० -२२

फरसबी ५० -५५ ४०-४५

वांगी १६ १२

वाटाणा ६० ८०

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस