नवी मुंबई

यंदा फ्लेमिंगो पक्षांचे उशिरा आगमन; पर्यावरणीय ताणाचे गंभीर संकेत, तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

यावर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीस उरण, नवी मुंबई आणि ठाणे खाडीतील पाणथळ जागांमध्ये दरवर्षी दिसणारे फ्लेमिंगो पक्षी उशिरा पोहोचणार आहेत. पर्यावरणतज्ज्ञांचा अंदाज आहे, की हा बदल दीर्घकाळ सुरू असलेल्या पावसामुळे होत आहे.

नेहा जाधव - तांबे

यावर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीस उरण, नवी मुंबई आणि ठाणे खाडीतील पाणथळ जागांमध्ये दरवर्षी दिसणारे फ्लेमिंगो पक्षी उशिरा पोहोचणार आहेत. पर्यावरणतज्ज्ञांचा अंदाज आहे, की हा बदल दीर्घकाळ सुरू असलेल्या पावसामुळे होत आहे.

पर्यावरणवादी बी.एन. कुमार यांच्या मते, फ्लेमिंगो हे निरोगी परिसंस्थांचे दूत आहेत. जेव्हा हे पक्षी मोठ्या संख्येने पाणथळ जागांमध्ये येतात, तेव्हा याचा अर्थ परिसंस्था निरोगी आहे. मात्र त्यांचे उशिरा आगमन ही परिसंस्थांवर वाढत असलेल्या ताणाची गंभीर चेतावणी आहे.

पाणथळ जागा टिकवणे काळाची गरज

मान्सूननंतर झालेल्या पावसामुळे पाणथळ जागांमध्ये बदल झाला असून, नवी मुंबई, उरण आणि पनवेलमधील काही पाणथळ जागा नष्ट झाल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. ही जागा टिकवणे महत्त्वाचे आहे कारण या क्षेत्रांमध्ये पाणथळ परिसंस्थांचे आरोग्य अवलंबून आहे. फ्लेमिंगो हे फिल्टर-फीडर आहेत. ते बायोटर्बेशनद्वारे चिखलाला ऑक्सिजन देतात आणि पोषक तत्वांचे संतुलन रखतात. त्यामुळे पाणथळ जागा केवळ पक्ष्यांसाठीच नव्हे तर पर्यावरणाच्या आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

जर पाणथळ जागा नष्ट झाल्या तर...

बी.एन. कुमार यांनी नमूद केले की, रामसर आणि UNEP सारख्या जागतिक संस्थांनी या किनारी पाणथळ जागा आणि खारफुटींना “ब्लू कार्बन” सिंक म्हणून मान्यता दिली आहे. या जागा मोठ्या प्रमाणात कार्बन साठवतात, पूर धोका कमी करतात. पण, त्यांचा नाश झाल्यास साठवलेला कार्बन बाहेर पडतो, ज्यामुळे नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढतो.

निसर्गाच्या संकेतांकडे लक्ष देणे गरजेचे

कुमार यांनी प्रशासनाला सुचवले की, या परिसंस्थांकडे दुर्लक्ष करू नये, कचरा टाकणे थांबवावे, आणि पाणथळ जागा पुनर्प्राप्तीसाठी तयार केलेल्या रिअल इस्टेटपेक्षा महत्त्वपूर्ण हवामान मालमत्ता म्हणून जपाव्यात. फ्लेमिंगोंच्या उशिरा आगमनामुळे स्थानिक परिसंस्थांवर हवामान बदलाचा कसा परिणाम होत आहे, हे स्पष्ट होते. तज्ज्ञांचा असा इशारा आहे की, निसर्गाच्या या संकेतांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

मालमत्ता कर न भरणे पडले महागात; ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी ४८३ वर जप्तीची कारवाई; २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित

Maharashtra Weather : राज्यात हवामान बदलाची चिन्हे; कडाक्याच्या उन्हानंतर 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा

Mumbai : अधिवेशनादरम्यान विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

ठाणे होणार कचरामुक्त; पहिला प्रकल्प गायमुख येथे; १०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती

LPG ग्राहकांनो लक्ष द्या! e-KYC अनिवार्य; मोबाईलवर काही मिनिटांत पूर्ण करा ही प्रक्रिया