नवी मुंबई

कांदा-बटाटा मार्केट २४ ऑगस्टला बंद

महाराष्ट्रात कांद्याच्या उपलब्धतेचा प्रश्न नाही

नवशक्ती Web Desk

नवी मुंबई : कांदा शेतकऱ्यांच्या समर्थनात वाशीच्या एपीएमसी बाजारातील कांदा-बटाटा मार्केट २४ ऑगस्ट रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. कांद्यावर ४० टक्के निर्यात कर लादल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. या शेतकऱ्यांना समर्थन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कांदा-बटाटा बाजाराचे संचालक अशोक वाळूंज म्हणाले की, दिल्लीतील कांदा उपलब्धतेवरून केंद्राने हा निर्णय घेतला आहे. मात्र, महाराष्ट्रात कांद्याच्या उपलब्धतेचा प्रश्न नाही.

एपीएमसी बाजारातील कांद्याची खरेदी किंमत १७ ते २२ रुपये किलो आहे. दोन आठवड्यापूर्वी दुसऱ्या व तिसऱ्या दर्जाचा कांदा १० ते ५ रुपये किलोने उपलब्ध होता.

वीजचोरांवर AI चा 'सर्जिकल स्ट्राईक'; तीन महिन्यांत २८ हजार वीजचोरीचा पर्दाफाश, २८९ प्रकरणांत फौजदारी गुन्हे दाखल

Mira-Bhayandar : उत्तन-पाली डम्पिंगला हरित लवादाचा दणका; तीन महिन्यांत ९.०९ लाख मेट्रिक टन कचरा हटवा

नांदेड-भोकर महामार्गावर भीषण अपघात; सहा ठार, दहा जण जखमी; भोकर व नांदेड येथे उपचार सुरू

Sindhudurg : पक्षाच्या प्रतिमेला ‘गालबोट’ लावणाऱ्यांची गय नाही! नितेश राणेंचा कार्यकर्त्यांना इशारा

Thane : रखडलेले SRA प्रकल्प आता रडारवर; अकार्यक्षम विकासकांना हटविण्याचे संकेत