नवी मुंबई

कांदा-बटाटा मार्केट २४ ऑगस्टला बंद

महाराष्ट्रात कांद्याच्या उपलब्धतेचा प्रश्न नाही

नवशक्ती Web Desk

नवी मुंबई : कांदा शेतकऱ्यांच्या समर्थनात वाशीच्या एपीएमसी बाजारातील कांदा-बटाटा मार्केट २४ ऑगस्ट रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. कांद्यावर ४० टक्के निर्यात कर लादल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. या शेतकऱ्यांना समर्थन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कांदा-बटाटा बाजाराचे संचालक अशोक वाळूंज म्हणाले की, दिल्लीतील कांदा उपलब्धतेवरून केंद्राने हा निर्णय घेतला आहे. मात्र, महाराष्ट्रात कांद्याच्या उपलब्धतेचा प्रश्न नाही.

एपीएमसी बाजारातील कांद्याची खरेदी किंमत १७ ते २२ रुपये किलो आहे. दोन आठवड्यापूर्वी दुसऱ्या व तिसऱ्या दर्जाचा कांदा १० ते ५ रुपये किलोने उपलब्ध होता.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक