नवी मुंबई

पतीला कामाला जायला उशीर झाल्यामुळे भांडण झाले, रागात पत्नीने टोकाचे पाऊल उचलले

नवी मुंबईच्या वाशीमधील घटना, पतीसोबत झाला होता किरकोळ वाद

Swapnil S

नवी मुंबई : पतीसोबत झालेल्या किरकोळ वादातून एका विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाशी सेक्टर-१४ मध्ये मंगळवारी सकाळी घडली. वाशी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेतील मृत विवाहितेचे नाव माधवी वैभव केंजळे असे असून, ती वाशी सेक्टर-१४ मधील गंगासागर सोसायटीत पतीसह राहण्यास होती.

मंगळवारी सकाळी माधवीचा पती वैभव याला कामावर जाण्यास उशीर होत होता. याच कारणावरून माधवी व वैभव या पतीपत्नीमध्ये बाचाबाची झाली. या गोष्टीचा राग आल्याने माधवीने घरातील बेडरुममध्ये जाऊन गळफास घेतला. हा प्रकार वैभवच्या लक्षात आल्यानंतर त्याने माधवीला पीकेसी या हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला उपचारासाठी महापालिका रुग्णालयात नेले; मात्र तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले. या घटनेनंतर वाशी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता