संपादकीय

बालकांचे मानसिक आरोग्य महत्त्वाचे

मुलांना मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी अधिक समर्थनाची गरज असल्याचे अनेक डॉक्टरांनी अधोरेखित केले आहे

प्रतिनिधी

आपल्याकडे समाजात एकंदरच मानसिक आरोग्याबाबत फारशी चिंता केली जात नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. बालपणातील मानसिक आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मात्र, त्याच वयात मुलांच्या भविष्याचा पाया घातला जातो. भावी आयुष्यात बाळांना आणि लहान मुलांना मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी अधिक समर्थनाची गरज असल्याचे अनेक डॉक्टरांनी अधोरेखित केले आहे. ब्रिटनचे रॉयल कॉलेज ऑफ सायकियाट्रिस्ट्स यावर अधिक संशोधन करत आहेत. वैद्यकीय संशोधन असे दर्शवते की, गर्भधारणेपासून ते पाच वर्षांच्या वयापर्यंत - लवकरात लवकर हस्तक्षेप केल्याने गंभीर परिस्थिती उद्भवणे किंवा बिघडणे थांबविण्यात मदत होऊ शकते. युनिसेफ यूके, रॉयल कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स अँड चाइल्ड हेल्थ आणि रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकोलॉजिस्ट यासह अनेक संस्थांनी या विस्तृत अहवालाला पाठिंबा दिला आहे.

सरकारी आकडेवारी दर्शविते की, दोन ते चार वर्षांच्या मुलांपैकी सुमारे ५ टक्के मुले चिंता, वर्तणुकीशी संबंधित विकार आणि न्यूरोडेव्हलपमेंटल विकारांनी बाधित आहेत. रॉयल कॉलेज ऑफ सायकियाट्रिस्ट्सच्या अहवालात असे सुचवले आहे की, अर्ध्या मानसिक व्याधी वयाच्या १४ व्या वर्षी उद्भवतात आणि बर्याच जणांना आयुष्याच्या सुरुवातीच्या वर्षांत विकसित होण्यास सुरुवात होते. त्यामुळे लवकर कृती महत्वाची असते. मानसिक आरोग्य व्याधी असलेल्या बहुतेक पाच वर्षांखालील मुलांना उत्पादक, कार्यशील प्रौढ बनण्यास आणि त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यास मदत करण्यासाठी आवश्यक असलेला पाठिंबा मिळत नाही. गर्भधारणेपासून पाच वर्षांपर्यंतचा कालावधी मुलांचा प्रौढत्वात निरोगी विकासासाठी आवश्यक आहे. दुर्दैवाने, या वर्षांना अनेकदा महत्त्व दिले जात नाही. पालक, काळजी घेणारे आणि एकंदरीत समाज यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यामध्ये सकारात्मक नातेसंबंध सुरक्षित करणे आणि मुलाच्या सामाजिक, भावनिक आणि संज्ञानात्मक विकासासाठी आधार देणारे पोषक वातावरण यांचा समावेश होतो.

Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video

Mumbai : अंधेरीत साकारणार मीनाक्षी मंदिर; क्रांती गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

Mumbai : गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज; ३८३ कृत्रिम तलाव; १,१३२ जीवरक्षक तैनात

Mumbai : धोकादायक पुलांवर खबरदारी! गणेशोत्सवात सावधगिरीचे आवाहन; रेल्वे मार्गावरील पुलांचा समावेश

Mumbai : चेंबूरमध्ये चालत्या बेस्ट बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला, ४० प्रवासी बचावले