फोटो

ग्रीन टीचे फायदे अनेक, पण... 'या' चुका पडतील महागात

Swapnil S
अनोशेपोटी ग्रीन टी पिणे जर तुम्ही सकाळी अनोशेपोटी ग्रीन टीचं सेवन करताय, तर ही चूक तुम्हाला महागात पडू शकते. जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात ग्रीन टीने करत असाल तर, हे आजच बंद करा. अनोशेपोटी ग्रीन टी प्यायल्याने अॅसिड वाढते. पचनाशी संबंधित कोणतीही समस्या टाळण्यासाठी ग्रीन टी पिण्यापूर्वी काहीतरी हेल्दी खा.
जास्त प्रमाणात ग्रीन टी पिणे ग्रीन टी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात, असे मानले जाते. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक अत्यंत वाईट मानला जातो. ग्रीन टी जास्त प्रमाणात प्यायल्यास तणाव, निद्रानाश आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. दररोज दोन किंवा तीन कप पेक्षा जास्त ग्रीन टी पिऊ नका, हे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.
टी बॅग पुन्हा वापरणे ग्रीन टी बॅग्ज पुन्हा वापरणे टाळा. कारण टी बॅग्ज पुन्हा वापरल्याने चहाची चव चांगली राहत नाही. तसेच हा चहा आरोग्यदायी ठरत नाही. यामुळे तुम्हाला पुरेसे पोषण मिळत नाही. प्रत्येक वेळी ग्रीन टी पिताना नेहमी ताजी पाने किंवा नवीन टी बॅग वापरा.
रात्री झोपताना ग्रीन टी पिणे ग्रीन टीमध्ये कॅफिन देखील असल्याने रात्रीच्या वेळी प्यायल्याने झोपेवर वाईट परिणाम होतो. यामुळेच झोपण्यापूर्वी कधीही ग्रीन टीचे सेवन करू नये.
जेवणानंतर लगेचच ग्रीन टी पिणे जेवल्यानंतर लगेचच ग्रीन टी पिण्याची चूक चुकूनही करू नये. कारण त्यामुळे अन्नातून पोषक तत्त्वे मिळण्यात अडथळे निर्माण होतात. यामुळे अन्नातील लोहाचे शोषण होण्यास अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. जर तुम्हाला ग्रीन टी प्यायची असेल तर जेवल्यानंतर 1-2 तासांनंतरच ग्रीन टी प्या.
औषधांसह ग्रीन टी पिणे ग्रीन टी काही औषधांसोबत घेतल्यास त्यामध्ये प्रक्रिया होऊन याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. यामध्ये एन्टीडिप्रेसंट्स, ब्लड थिनर्स आणि ब्लड प्रेशरच्या औषधांचा समावेश आहे. तुम्ही असे कोणतेही औषध घेत असाल, तर ग्रीन टीचे सेवन टाळा किंवा तसे करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा; गुढीपाडव्यापासून १५ डब्यांच्या लोकल वाढणार, १६ उपनगरीय सेवांचे होणार रूपांतर

Gudi Padwa 2026 : उद्या स्वागत यात्रांचा मुंबईभर जल्लोष; गिरगाव, कुर्ला, दादर येथे चित्ररथ, खेळांची पर्वणी

इंदूरमध्ये EV चार्ज करताना शॉर्ट सर्किट; सिलिंडरचा भीषण स्फोट, ७ जणांचा दुर्दैवी अंत

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘रत्नागिरीचा राजा’ शहरात दाखल; हापूसच्या आगमनाने बाजारात सुगंध, दर मात्र दुपटीने वाढले

मध्य रेल्वे २०१२ उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवणार; अतिरिक्त १२० विशेष गाड्या चालविण्याचे नियोजन