फोटो

Pulwama Attack : १४ फेब्रुवारी... 'काळा दिवस'; देश कधीच विसरू शकत नाही अशी आठवण

१४ फेब्रुवारी हा दिवस जगभर प्रेमदिन म्हणून ओळखला जातो, पण भारतासाठी हा दिवस वेदनादायी आठवणींचा आहे.

Mayuri Gawade

१४ फेब्रुवारी हा दिवस जगभर प्रेमदिन म्हणून ओळखला जातो, पण भारतासाठी हा दिवस वेदनादायी आठवणींचा आहे.

२०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाले आणि संपूर्ण देश शोकसागरात बुडाला.

त्या दिवशी जम्मू-काश्मीर महामार्गावरून सीआरपीएफच्या ताफ्यात सुमारे २५०० जवान श्रीनगरकडे निघाले होते.

अवंतीपोरा येथील लेथपोरा परिसरात कारमध्ये भरलेले स्फोटके बसला धडकली आणि भीषण स्फोट झाला.

आवाज अनेक किलोमीटर दूर ऐकू आला आणि परिसर धुराने झाकला गेला.

या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, अनेक कुटुंबांचा आधार हिरावला गेला.

या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घेतली.

भारताने २६ फेब्रुवारीला पाकिस्तानातील बालाकोटमध्ये हवाई कारवाई केली, ज्याला ‘बालाकोट एअर स्ट्राइक’ म्हणतात.

या दिवशी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून त्यांचे बलिदान स्मरण केले जाते.

म्हणून भारतात १४ फेब्रुवारीला ‘काळा दिवस’ म्हणून स्मरण केले जाते.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

आता AI ठेवणार पक्ष्यांवर नजर! महाराष्ट्रात उभारलं जाणार देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य

Mumbai Rains : पावसात अडकलेल्या मुंबईकरांना 'Vi'चा दिलासा! स्टोअरमध्ये घेता येणार आश्रय, मोबाईल चार्जिंगचीही सोय

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन