राजकीय

बच्चू कडूंच्या विधानावर अंबादास दानवे म्हणाले, "आमच्याकडे..."

१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागेल, असं विधान बच्चू कडू यांनी केलं होतं

नवशक्ती Web Desk

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे घेणार आहेत. त्यासाठी ते सुरुवातीला ठाकरे गटाच्या आमदारांची बाजू

ऐकूण घेणार आहेत. त्यांच्या या निर्यणयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. असं असताना आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागेल, असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. आता यावर ठाकरे गटाचे नेते राज्याच्या विरोधी पक्षाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार बच्चू कडू म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना या पक्षाबाबत मजबुतीने आणि चलाखीने कामगिरी बजावली आहे. त्यामुळे १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाजून लागेल.

यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एका वृत्तीवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत यावर भाष्य केलं आहे. राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत आहेत. काहीतरी कुरापती काढून विलंब लावला जात आहे. आता बच्चू कडूंनी केलेल्या वक्तव्यावरुन कळत की काय निर्णय द्यायचा हे आधीच ठरलं होतं की काय? पण, सर्वोच्च न्यायालयाचा पर्याय आमच्याकडे आहे. म्हणून अध्यक्षानी दिलेला निकाल हा अखेरचा नसलेस असं दानवे म्हणाले.

तसंत त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीक केली आहे. ते म्हणाले की, दररोज एक असे ५३ आमदारांची बाजू विधानसभा अध्यक्ष ऐकणार आहेत. हा वेळकाढू पणा आहे. सगळ्या आमदारांची बाजू ही एकत्रच ऐकची पाहीजे. असं ते म्हणाले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक