राजकीय

मोदी धनदांडग्यांना मदत करतात - राहुल गांधी

निवडणूक रोखे हा खंडणीचाच एक प्रकार असल्याची टीका गांधी यांनी केली आणि सीबीआय, ईडी आणि प्राप्तिकर विभागाला विशिष्ट उद्योगपतींविरुद्ध तैनात करण्यात आल्याचा आरोपही राहुल गांधी केला.

Swapnil S

कोझिकोडे/वायनाड (केरळ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील मोजक्या धनदांडग्यांना मदत करीत असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा येथे केला.

निवडणूक रोखे हा खंडणीचाच एक प्रकार असल्याची टीका गांधी यांनी केली आणि सीबीआय, ईडी आणि प्राप्तिकर विभागाला विशिष्ट उद्योगपतींविरुद्ध तैनात करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

प्रत्येक लहान शहरात आणि गावात रस्त्यावर धाक दाखवून काही जण खंडणी वसुली करतात, मल्याळी भाषेत तुम्ही त्याला 'कोल्ला अडिक्कल' असे म्हणता, मात्र नरेंद्र मोदी त्याला निवडणूक रोखे म्हणतात, एखादा भुरटा चोर जे रस्त्यावर करतो तेच मोदी आंतरराष्ट्रीय स्तरावर करतात, असा आरोप गांधी यांनी केला.

ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभागाचे अधिकारी येतात, ते चौकशी करतात आणि अखेरीस तुम्ही आपला उद्योग अदानी समूहाला का देत नाही, असे विचारतात आणि अशा प्रकारेच मुंबई विमानतळ अदानींना बहाल करण्यात आले, असे राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, वायनाड येथेही गांधी यांनी मोदींवर जोरदार टीका केली.

Pune Accident : कोरेगाव पार्क परिसरात भीषण दुर्घटना; भरधाव कारची मेट्रोच्या खांबाला जोरदार धडक, गाडीचे झाले तुकडे, २ भावांचा जागीच मृत्यू |Video

Women’s World Cup : ऐतिहासिक विजेतेपदाचे लक्ष्य; भारत-दक्षिण आफ्रिका महिला संघांत आज अंतिम लढत

जयपूर हादरले! सहावीतल्या विद्यार्थिनीची आत्महत्या; शाळेतल्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन, CCTV कॅमेऱ्यात थरारक घटना कैद

Women’s World Cup : क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! महिला विश्वचषक फायनलसाठी हार्बर लाईनवरील मेगा ब्लॉक रद्द

मांडवा जेट्टी कोसळण्याच्या उंबरठ्यावर? प्रवाशांचा जीव धोक्यात; सागरी मंडळाचे दुर्लक्ष