राजकीय

मोदी धनदांडग्यांना मदत करतात - राहुल गांधी

निवडणूक रोखे हा खंडणीचाच एक प्रकार असल्याची टीका गांधी यांनी केली आणि सीबीआय, ईडी आणि प्राप्तिकर विभागाला विशिष्ट उद्योगपतींविरुद्ध तैनात करण्यात आल्याचा आरोपही राहुल गांधी केला.

Swapnil S

कोझिकोडे/वायनाड (केरळ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील मोजक्या धनदांडग्यांना मदत करीत असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा येथे केला.

निवडणूक रोखे हा खंडणीचाच एक प्रकार असल्याची टीका गांधी यांनी केली आणि सीबीआय, ईडी आणि प्राप्तिकर विभागाला विशिष्ट उद्योगपतींविरुद्ध तैनात करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

प्रत्येक लहान शहरात आणि गावात रस्त्यावर धाक दाखवून काही जण खंडणी वसुली करतात, मल्याळी भाषेत तुम्ही त्याला 'कोल्ला अडिक्कल' असे म्हणता, मात्र नरेंद्र मोदी त्याला निवडणूक रोखे म्हणतात, एखादा भुरटा चोर जे रस्त्यावर करतो तेच मोदी आंतरराष्ट्रीय स्तरावर करतात, असा आरोप गांधी यांनी केला.

ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभागाचे अधिकारी येतात, ते चौकशी करतात आणि अखेरीस तुम्ही आपला उद्योग अदानी समूहाला का देत नाही, असे विचारतात आणि अशा प्रकारेच मुंबई विमानतळ अदानींना बहाल करण्यात आले, असे राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, वायनाड येथेही गांधी यांनी मोदींवर जोरदार टीका केली.

समुद्रातील मासेमारीला लहान बोटी मुकणार; शासनाच्या निर्णयाला मच्छीमार कृती समितीचा विरोध

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबईत घुसले १४ दहशतवादी, ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवणार; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धमकी

Mumbai : लालबागच्या राजाचे अंतिम दर्शन घ्यायचे आहे? मग 'या' मार्गावर द्या बाप्पाला शेवटचा निरोप!

“शशी थरूर यांना स्पर्धक मिळाला”; पंजाबच्या महापुराबाबत पठ्ठ्याचं तोडकं-मोडकं इंग्रजी ऐकून नेटकरी लोटपोट, Video व्हायरल