राजकीय

मतमोजणीच्या वेळी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा, इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाची मागणी

Swapnil S

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असून त्यादिवशी सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य प्रकारे पालन केले जाईल असे पाहावे, अशी विनंती इंडिया आघाडीतील नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने रविवारी निवडणूक आयोगाच्या पूर्ण पीठाकडे केली. ईव्हीएमचे निकाल जाहीर होण्यापूर्वी टपालाद्वारे करण्यात आलेले मतदान जाहीर करावे, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली आहे.

सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने आयोगाची ही तिसऱ्यांदा भेट घेतली. आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य प्रकारे पालन केले जावे, अशा सूचना अधिकाऱ्यांना द्याव्या, अशी मागणीही करण्यात आली. ईव्हीएम यंत्राची ने-आण सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या मार्गिकेतूनच केली जावी, ईव्हीएम यंत्रं सील केले त्यावेळीच्या पावत्या पडताळणीसाठी निवडणूक प्रतिनिधींना दाखविण्यात याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे, असे माकपचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांनी सांगितले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस