राजकीय

मतमोजणीच्या वेळी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा, इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाची मागणी

लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असून त्यादिवशी सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य प्रकारे पालन केले जाईल असे पाहावे, अशी विनंती इंडिया आघाडीतील नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने रविवारी निवडणूक आयोगाच्या पूर्ण पीठाकडे केली.

Swapnil S

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असून त्यादिवशी सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य प्रकारे पालन केले जाईल असे पाहावे, अशी विनंती इंडिया आघाडीतील नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने रविवारी निवडणूक आयोगाच्या पूर्ण पीठाकडे केली. ईव्हीएमचे निकाल जाहीर होण्यापूर्वी टपालाद्वारे करण्यात आलेले मतदान जाहीर करावे, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली आहे.

सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने आयोगाची ही तिसऱ्यांदा भेट घेतली. आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य प्रकारे पालन केले जावे, अशा सूचना अधिकाऱ्यांना द्याव्या, अशी मागणीही करण्यात आली. ईव्हीएम यंत्राची ने-आण सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या मार्गिकेतूनच केली जावी, ईव्हीएम यंत्रं सील केले त्यावेळीच्या पावत्या पडताळणीसाठी निवडणूक प्रतिनिधींना दाखविण्यात याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे, असे माकपचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांनी सांगितले.

IND vs AUS 1st T20: आता लक्ष टी-२० मालिकेकडे! सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारतीय संघाचा आज ऑस्ट्रेलियाशी पहिला सामना

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या निधीची चौकशी होणार; राज्य सरकारकडून निधी तपासण्याचे आदेश

Mumbai News : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर BMC मेहेरबान; रेल्वेकडे ५०० कोटी रुपयांचे पाणी बिल थकीत!

महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले; ठाण्यातील ‘त्या’ फलकाची चर्चा!

कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारला हायकोर्टाचा दणका; ‘आरएसएस’ला लक्ष्य करण्याच्या निर्णयाला स्थगिती