राजकीय

काही शक्ती जाती-धर्मामध्ये अंतर निर्माण करुन दंगली घडवत आहेत - शरद पवार

जे कर्नाटकात होऊ शकते, ते देशातील कोणत्याही राज्यात होऊ शकते, त्यासाठी प्रयत्न करत राहणे हे आपले काम असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

नवशक्ती Web Desk

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही शक्ती अहमदनगरमध्ये धर्माच्या नावाने दंगली घडवू पाहत असल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांनी कर्नाटक राज्यातील लोकांचे उदाहरण दिले. कर्नाटकात काही लोक सत्तेचा वापर करुन द्वेष पसरवत होते. मात्र जनतेने त्यांना धडा शिकवला. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. तसेच जे कर्नाटकात होऊ शकते, ते देशातील कोणत्याही राज्यात होऊ शकते, त्यासाठी प्रयत्न करत राहणे हे आपले काम असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. आज (21 मे) रविवार रोजी ते अहमदनगर येथे बोलत होते.

पवार पुढे म्हणाले की, "धर्माच्या नावाने अंतर वाढवले जाते आहे. अहमदनगर हा पुरोगामी जिल्हा आहे. अनेक ऐतिहासिक काम करणारे लोक या जिल्ह्यात होऊन गेले. नगरमधील शेवगावला दोन-तीन दिवस बाजारपेठ बंद होती. काही अदृश्य शक्ती जातींमध्ये अंतर वाढवत असून संघर्ष निर्माण करत आहेत. त्यांच्याशी लढाई करण्याचे, संघर्ष करण्याचे आव्हान माझ्यासह आपल्या सर्वांवर आहे. आपण ते केले नाही तर कष्टकरी लोकांचे आयुष्य उद्धवस्त झाल्याशिवाय राहणार नाही." असे देखील पवार यावेळी म्हणाले.

यावेळी कर्नाटकविषयी बोलतान ते म्हणाले की, "मी काल बंगळूर येथे होतो. देशातले चित्र बदलत आहे. त्या लोकांनी त्यांच्या सत्तेच्या काळात लोकांमध्ये द्वेष पसरवण्याचे काम केले. सर्व देशात कर्नाटक निवडणूक सत्ताधारी भाजप जिंकेल असे वाटले होते. मात्र काल सामान्य माणसांच्या सरकारचा शपतविधी झाला. यावेळी एक लाख लोक उपस्थित होते. यातील 70 टक्के संख्या ही तरुणांची होती." असे देखील ते म्हणाले.

Iran War Impact : मध्यपूर्वेतील संघर्षातही देशात LPG पुरवठा सुरळीत; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांना दिलासा; मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या जाहीर, पाहा वेळापत्रक

आखाती संघर्षाचा मच्छीमारांना फटका; 'बल्क कन्झ्युमर' वर्गीकरणामुळे संताप; डिझेल दरवाढीने मासेमारी व्यवसाय ठप्प

माथेरान 'मिनी ट्रेन'च्या फेऱ्या घटल्याने पर्यटक नाराज; 'मोटारकार' सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी

Mumbai : सिग्नलवरील मुलांसाठी आशेचा किरण! चेंबूरमध्ये 'सिग्नल स्कूल'ची सुरुवात, महापौरांच्या हस्ते उद्घाटन