राजकीय

"मूठभर का असेना पण निष्ठावान अशीच माणसं मला हवीत", उद्धव ठाकरेंचा शिंदे गटासह भाजवर निशाणा

खासदार संजय राऊत यांनी 'आवाज कुणाचा' पॉडकास्टमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं आहे.

नवशक्ती Web Desk

'सामना' है दैनिकाचे कार्यकारी संपादक आणि ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी 'आवाज कुणाचा' पॉडकास्टमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा पहिला भाग आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास प्रसारित झाला. तर दुसरा भाग हा उद्या (२७ जुलै) सकाळी ८ वाजता प्रसारित होणार आहे. यामुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यार सडकून टीका केली. इर्शाळवाडीतील घटनेच्या दुसऱ्याचं दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत मुजरा करायला गेले,अशी टीका ठाकरे यांनी केली.

यावेळी त्यांनी मणिपूरमध्ये सुरु असले्लया हिंसाचार, गोवंश हत्याबंदी आणि समान नागरी कायद्याच्या मुद्यावरुन पंतप्रधान मोदींचा धारेवर धरलं. तसंच २०२४ साली हे सरकार सत्तेत आलं तर देशात लोकशाही राहणार नाही, त्यानंतर निवडणूका होतील असं मला वाटत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयोगाचं काम हे निवडणूक निशाणी किंवा चिन्हं देण्याचं आहे. पक्षाचं नाव देण्याचं किंवा बदलण्याचं नाही. म्हणून आयोगाने दिलेल्या विचित्र निकालाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात गेलोय. त्यामुळे शिवसेना हे नाव मला पुन्हा मिळेल अशी खात्री आहे. असही उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी त्यांनी पंतप्रधानांनी बोलवलेल्या एनडीएच्या बैठकीवर टीका केली. बऱ्यांच वर्षांनंतर या देशातील एनडीए नावाचा अमिबा जिवंत आहे हे कळलं. एनडीएमध्ये फत्त ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत आहेत. अशी बोचरी टीका देखील त्यांनी केली. तसंच या मुलाखतीत त्यांनी बंडखोर आमदारांवर देखील निशाणा साधला. मनाने विकली गेलेली मानसे मला नकोच आहेत. मूठभर का असेना पण निष्ठावान अशीच माणसं मला हवीत. कारण तीच खरी शक्ती असते. पसाभर गद्दार घेऊन फिरण्यापेक्षा मूठभर निष्ठावान मला नेहमीच आवडतात, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

सोने दरात उसळी; चांदीही महागली; मौल्यवान धातू महिन्याच्या उच्चांकावर

नागपूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचे कोठडीतही चोचले; नाश्त्याला पिझ्झा, झोपायला मऊ बिछान्याची मागणी

Mumbai : विक्रोळीत सख्ख्या भावांमध्ये रक्तरंजित राडा; मोठ्या आवाजात गाणी लावल्याच्या वादातून डबल मर्डर

रेल्वे परिसरात धूम्रपान केल्यास २ हजारांचा दंड; फेरीवाले, अनधिकृत प्रवेशावरही कडक कारवाई

ठाणे जिल्ह्यात 'कॅन्सर व्हॅन'द्वारे मोफत तपासणी; ऑगस्टभर जनजागृती मोहीम; तीन टप्प्यात मार्गदर्शन