क्रीडा

भारतीय संघातील आणखी एक महिला खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, ‘नियमानुसार हे दोन्ही खेळाडू भारतीय संघात कोरोना निगेटिव्ह आल्यानंतरच सामील होऊ शकतात

वृत्तसंस्था

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाचा पहिला टी-२० सामना २९ जुलै रोजी ऑस्ट्रेलियाबरोबर होणार असतानाच संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. भारतीय संघातील दुसरी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ दोन खेळाडूंविनाच बर्मिंगहमला रवाना झाला.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले की, ‘भारतीय संघातील दुसरी खेळाडूदेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. दोन्ही कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू हे भारतातच थांबले आहेत.

दरम्यान, बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, ‘नियमानुसार हे दोन्ही खेळाडू भारतीय संघात कोरोना निगेटिव्ह आल्यानंतरच सामील होऊ शकतात.’

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी यापूर्वीच भारतीय महिला संघातील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे सांगितले होते. महिला क्रिकेट संघ राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणार आहे.

कोरोनाग्रस्त दोन खेळाडू ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील दुसरा सामना हा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ३१ जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर ३ ऑगस्टला साखळी फेरीतील शेवटचा सामना बार्बाडोस सोबत होणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील महिला टी-२० क्रिकेटचे सर्व सामने हे एजबस्टन येथे होणार आहेत. महिला क्रिकेटच्या सेमी फायनल आणि फायनलची सर्व तिकिटे आधीच विकली गेली आहे.

भारतीय संघ राष्ट्रकुल स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी संघाची कर्णधार हरमनप्रीतने सांगितले की, ‘खेळाडूंसाठी राष्ट्रकुल स्पर्धा महत्त्वाची आहे, असा अनुभव फार कमी जणांना मिळतो. त्यामुळे आम्ही या स्पर्धेसाठी उत्सुक आहोत. राष्ट्रकुल स्पर्धेचा उद्घाटनचा सोहळा आमच्यासाठी खास असणार आहे.

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप