क्रीडा

नागपूरच्या दिव्या देशमुखचा ऐतिहासिक विजय; बुद्धीबळ विश्वचषकात बाजी, ठरली पहिली भारतीय महिला विश्वविजेती

नागपूरच्या १९ वर्षीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने इतिहास रचला आहे. जॉर्जिया येथे सुरू असलेल्या महिलांच्या फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत दिव्याने धमाकेदार विजय मिळवला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिव्याने भारताच्या दिग्गज ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला पराभूत करत, भारतासाठी एक नवा इतिहास घडवला.

नेहा जाधव - तांबे

नागपूरच्या १९ वर्षीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने इतिहास रचला आहे. जॉर्जिया येथे सुरू असलेल्या महिलांच्या फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत दिव्याने धमाकेदार विजय मिळवला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिव्याने भारताच्या दिग्गज ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला पराभूत करत, भारतासाठी एक नवा इतिहास घडवला. यानंतर दिव्या देशमुख भारताची पहिली महिला विश्वविजेती ठरली आहे.

याआधी, २०२४ मध्ये तिने ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला होता. आता एका वर्षातच तिने वरिष्ठ गटात सर्वोच्च शिखर गाठून भारताला आणखी एक महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला आहे. दिव्याचा हा विजय केवळ बुद्धीबळ क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पाच नव्हे तर तिचा आत्मविश्वास आणि सामर्थ्य देखील सिद्ध करतो.

टायब्रेकरमध्ये निर्णायक विजय

दिव्याच्या विजयात टायब्रेकरचा महत्त्वपूर्ण रोल होता. अंतिम सामन्यात दिव्याने कोनेरू हम्पीला सुरुवातीच्या दोन्ही गेम्समध्ये ड्रॉ खेळण्यास भाग पाडलं, त्यामुळे सामना टायब्रेकरपर्यंत गेला. दोन टायब्रेकर गेम्समध्ये १५-१५ मिनिटांचा खेळ आणि प्रत्येक चालीनंतर १० सेकंदांची वाढ असताना, दिव्याने दुसऱ्या टायब्रेकरमध्ये काळ्या मोहऱ्यांवर विजय मिळवला आणि विश्वचषक जिंकला.

भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर

या विजयासह दिव्या देशमुख भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर बनली आहे. यापूर्वी, कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली आणि तानिया सचदेव या भारतीय महिलांनी ग्रँडमास्टरचा किताब मिळवला आहे.

विजयानंतर भावनिक क्षण

स्पर्धा जिंकताना दिव्या अत्यंत भावूक झाली. हा तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा क्षण होता. कँडिडेट्स टूर्नामेंटसाठी ती आधीच पात्र ठरली होती आणि आता तिने आपल्या नावावर विश्वविजेतेपदही मिळवलं.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘रत्नागिरीचा राजा’ शहरात दाखल; हापूसच्या आगमनाने बाजारात सुगंध, दर मात्र दुपटीने वाढले

मुंबईचा पाणीप्रश्न सभागृहात पेटला; शहरात टँकर लॉबी सक्रिय, सत्ताधारी पक्षांसह विरोधकांचा आरोप

Mumbai : अक्षय कुमारचे मुंबईकरांना स्वच्छतेचे आवाहन; स्वच्छ मुंबई स्पर्धा सुरू

वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

महिन्याला एक हजार कसे पुरणार? EPF पेन्शन वाढवण्याची संसदीय समितीची शिफारस